मुंबई : मागील काही दिवसापासून राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या निमंत्रणावरून चांगलाच वाद उफाळून आला. यातच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यावरून भाजपवर सातत्याने टिका करतांना दिसत आहेत. यातच बाबरी मशिद पाडली तेव्हा, भाजप कुठे होता ? राज्यातल्या भाजपचा संबंध राम मंदिराशी आहे तरी का ? असा सवाल ठाकरेंकडून केला जात आहे. यावर आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्रीराम सेवक आणि कारसेवक आहे. असं म्हणत फडणवीसांनी यावर सविस्तर लिहिलं आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्री राम सेवक आणि कार सेवक आहे. श्री रामजन्मभूमी आंदोलनात सहभागी झालेल्या कारसेवकांचा सन्मान करण्याच्या कार्यक्रमात आज ठाणे येथे कारसेवकांचा सन्मान करण्याचे सौभाग्य मला लाभले. यावेळी जगद्गुरू दिनेशाचार्य जी महाराज, पूज्य शशिकांतजी महाराज, केंद्रीय मंत्री कपिल पाटील जी, श्वेता शालिनी तसेच मोठ्या संख्येने श्रोते व श्री राम भक्त उपस्थित होते. हा काळ आपल्या सर्वांसाठी खूप आनंदाचा आहे, श्रीराम भक्तांनी 500 वर्षे याची वाट पाहिली. ही 500 वर्षांची बाबरीची ढाच्याची सल वेदनादायक होती. प्रत्येकाची इच्छा होती की आपल्या प्रभू श्री रामजींचे जन्मस्थान आपल्याला मिळावे.
हेही वाचा…“गद्दारांना पाताळात असं गाडायचं की डिपॉझिट जप्त झालं पाहिजे”, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची मशाल पेटवली. स्वभाषा, स्वधर्म आणि स्वराज्याचा नारा दिला. देव, देश आणि धर्मासाठी झटण्याचे बळ त्यांनी दिले.मुघलांनी जिथे जिथे आपल्या श्रद्धेची प्रतीके नष्ट केली होती, तिथे महाराणी अहिल्याबाई होळकर यांनी देशभरात त्यांची पुनर्स्थापना करण्याचे काम केले. असे असूनही बाबरी ढाच्याची सल मनात रुतून राहिली होती. यानंतर एक आंदोलन सुरू झाले आणि 6 डिसेंबर 1992 रोजी कलंकाची आणि गुलामीचे प्रतीक असलेली ही वास्तू पाडल आणि रात्रभरात राम ललाचे मंदिर बांधण्यात आले. तरीही प्रभू श्रीराम जी एका छोट्या मंदिरात बसले होते याची रुखरुख मनात होती. आमचा नारा होता ‘राम लला हम आयेंगे और मंदिर भव्य बनायेंगे!’
हेही वाचा…मनसेच्या ताब्यातील सर्वोकृष्ट ग्रामपंचायतीला राज ठाकरेंकडून ५ लाखाचं बक्षीस जाहीर, म्हणाले…
आता वेळ आली आहे, 22 जानेवारीला श्री रामजी पुन्हा एकदा आपल्या जागेवर विराजमान होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्री राम मंदिरात प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम संपन्न होणार आहे. महाराष्ट्रातील काही लोक ‘मंदिर वहीं बनायेंगे, तारीख़ नहीं बतायेंगे’ म्हणून हिणवायचे. त्यांना सांगतो भगवान श्री रामाचे मंदिर बनले आहे आणि तुम्हाला 22 जानेवारीला जायचे असेल तर जा पण आत जायची आणि रामललाच्या नजरेला नजर मिळवण्याची हिंमत कुठून आणणार? उद्धव ठाकरे जी यांना मी सांगू इच्छितो, जेव्हा कारसेवा झाली तेव्हा मी 20 वर्षांचा होतो. त्यावेळी ‘लाठी गोली खाएँगे मंदिर वहीं बनायेंगे’ अशा घोषणा देत होतो. त्यावेळी तुम्ही कुठेतरी फोटो काढत होतात.
उद्धवजी, तुमच्यासोबतचा एक तरी नेता दाखवा जो कारसेवक राहिला असेल? आम्ही सगळे तेथे होतो. अनेक राज्यांच्या सरकारांना लाथ मारली. उद्धवजी, तुम्ही म्हणालात की बाबरी माझ्या वजनाने पडली असती, अहो, श्रीरामाचा भक्त हिमालयालाही हादरवू शकतो, बाबरी काय आहे त्यासमोर? ज्यांनी रामजन्मभूमीसाठी झटलेल्या कोठारी बंधूंना शहीद केले. त्याच्या मांडीला मंडी लाऊन बसलेल्या राजकीय हिंदूंनी आम्हाला हिंदुत्व सांगू नये!
ठाणे ही धर्माची नगरी असुनही इथे काही अधर्मी लोक राहतात. जे देव काय खात होते हे सांगत बसतात, अशा अधर्मी लोकांकडे लक्ष देऊ नये. आपण सर्वांनी या 22 जानेवारीला रामललाच्या आगमनाची अशी तयारी करावी की सर्व जगाला समजेल की आपले राजा श्री रामचंद्रजी पुन्हा एकदा आपल्या स्थानी विराजमान होत आहेत.
READ ALSO :
हेही वाचा…शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला अटकेत, पनवेलच्या फार्महाऊसवर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…“निमंत्रण असूनही काॅंग्रेस राम मंदिराच्या कार्यक्रमाला का जाणार नाही ?” शरद पवारांनी सांगितलं कारण म्हणाले..
हेही वाचा..उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार ? भाजपने दिले चॅलेंज
हेही वाचा…मोठी बातमी..! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून खर्गे तर संयोजकपदी नितीश कुमारांची नियुक्ती
हेही वाचा…“मोदींना महान म्हणायचे फक्त पाकिस्तान अन् उद्धव ठाकरेच राहिले”, भाजपच्या बड्या नेत्याचं विधान