मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील २० जानेवारीपासून मुंबईच्या दिशेने आंदोलनासाठी रवाना होणार आहेत. आज पत्रकार परिषद घेऊन मुंबईत धडकण्यासाठी कशापद्धतीने तयारी केली आहे. कुठे कुठे ? आंदोलनकर्त्यांचा मुक्काम असणार आहे. यासंदर्भात त्यांनी आज माहिती दिली. तसेच आता आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही मागे हटणार नाहीत. असा इशाराही त्यांनी दिला आहे.
हेही वाचा..उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार ? भाजपने दिले चॅलेंज
येत्या २० जानेवारीला मनोज जरांगे यांच्यासह असंख्य मराठा बांधव सकाळी अंतरवाली सराटी गावातून मुंबईच्या दिशेने निघणार आहेत. त्यानंतर कोळगावमध्ये दुपारचं जेवण, तर या आंदोलनाचा पहिला मुक्काम शिरूर मातोरीमध्ये होणार आहे. त्यानंतर २१ जानेवारीला ते तनपुरवाडी ते पाथर्डी दरम्यान, दुपाचं जेवण करणार असून कंरजी घाटात त्यांचा मुक्काम असणार आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून खर्गे तर संयोजकपदी नितीश कुमारांची नियुक्ती
२२ जानेवारीला पारनेरमधील सुपा येथे दुपारचं जेवण तर रांजणगावमध्ये मुक्काम असणार आहे. २३ जानेवारीचं शिरूर तालुक्यातील कोरेगावमध्ये दुपारचं जेवण तर खराडी बायपासला मुक्काम असणार आहे. यावेळी जेवणाची व्यवस्था तिथल्या आजूबाजूच्या गावातील लोकं करणार असल्याचंही मनोज जरांगे पाटिल यांनी सांगितले. तसेच २४ जानेवारीला तळेगाव दाभाडेमध्ये, तर लोणावळ्यात मुक्काम असणार आहे. २५ जानेवारीला पनवेलमध्ये दुपारचं जेवण तर वाशीत आंदोलनकर्त्यांचं मुक्काम असणार आहे. त्यानंतर २६ जानेवारीला मराठा वादळ मुंबईत दाखल होणार असून आझाद मैदान किंवा शिवाजी पार्कवर प्रत्यक्ष आंदोलनाला सुरूवात होणार आहे. त्यामुळे या आंदोलनाकडे आता संपुर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलं आहे.
READ ALSO :
हेही वाचा.मोठी बातमी…! “एक फोन आला अन्…. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
हेही वाचा…“मोदी नकोच, अन् मोदींसोबतचे ढोंगीपण नको, “शिवसेनेच्या धर्मवीरांच्या ठाण्यात लागले बॅनर
हेही वाचा…“छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्रीराम सेवक आणि कारसेवक”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला अटकेत, पनवेलच्या फार्महाऊसवर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…“निमंत्रण असूनही काॅंग्रेस राम मंदिराच्या कार्यक्रमाला का जाणार नाही ?” शरद पवारांनी सांगितलं कारण म्हणाले..