मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काॅंग्रेसचे नेते मिलिंद देवरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. पुढील निवडणुकीत मुंबई दक्षिण जागा ही ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता असल्याने मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यातच एकनाथ शिंदे यांच्याकडून दक्षिण लोकसभा मतदारसंघात मिलिंद देवरा यांना उमेदवारी देण्याची शक्यता असल्याने भाजपला आता लोकसभा दक्षिण मुंबईवरील दावा सोडावा लागणार आहे.
हेही वाचा…“निमंत्रण असूनही काॅंग्रेस राम मंदिराच्या कार्यक्रमाला का जाणार नाही ?” शरद पवारांनी सांगितलं कारण म्हणाले..
मागील गेल्या काही महिन्यांपासून दक्षिण लोकसभा मतदारसंघाबाबत भाजपने दावा सांगितला होता. याठिकाणी भाजपकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांची नावे चर्चेत आली होती. मात्र मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राजकीय गणितं बदलली आहेत. मागच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेकडून अरविंद सावंत यांनी मिलिंद देवरा यांचा पराभव केला होता. त्यामुळे ही जागा आता पुन्हा महाविकास आघाडीकडून ठाकरे गटाला मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मिलिंद देवरा यांच्यापुढे मोठा पेच निर्माण झाला. त्यानंतर त्यांनी शिंदे गटात जाण्याचा मार्ग स्विकारला.
हेही वाचा..उद्धव ठाकरे लोकसभा निवडणुक लढवणार ? भाजपने दिले चॅलेंज
दक्षिण मुंबईत मराठी-अमराठी मतांचं समीकरण बघता भाजपला ही जागा शिवसेनेसाठी सोडावी लागणार आहे. १० तारखेला विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांनी आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात निकाल देतांना दोन्ही गटाचे कोणतेही आमदार अपात्र केले नाहीत. त्यावरून आता मिलिंद देवरा यांच्या पक्ष प्रवेशामागे राजकीय खेळी असल्याचं बोलण्यात येत आहे. ज्या दक्षिण मुंबईच्या जागेवर नार्वेकरांचा दावा होता. त्याच जागेवर आता मिलिंद देवरा हक्का सांगणार हे नक्की आहे. त्यामुळे आधी निकाल येऊ देणं आणि मग देवरांना प्रवेश देणं. यामागे मुत्सुद्देगिरी असल्याचं सांगण्यात येत आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! इंडिया आघाडीच्या अध्यक्षपदी मल्लिकार्जून खर्गे तर संयोजकपदी नितीश कुमारांची नियुक्ती
दरम्यान, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत मिलिंद देवरांचा अरविंद सावंत यांनी पराभव केला. तर वंचितकडून डॉ. अनिल कुमार यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं होतं. या जागेवर १९५२ पासून ते १९६७ पर्यंत कॉंग्रेसचं वर्चस्व होतं. मात्र १९६७ मध्ये जॉर्ज फर्नांडिस यांनी जनता दलातर्फे निवडणूक लढवली. अन् कॉंग्रेसकडून हा मतदारसंघ खेचून आणला. तर १९८४ पासून १९९६ पर्यंत काॅंग्रेसच्या मुरली देवरा यांनी पुन्हा सत्ता स्थापन केली. यातच १९९६ मध्ये भाजपच्या जयवंतीबेन इथे निवडून आल्या. मात्र. १९९८ मध्ये पुन्हा मुरली देवरा विजयी झाले. तर १९९९ मध्ये जयवंतीबेन मेहतांनी विजय मिळवला. तर २००४ मध्ये मुरली देवरा यांचे पुत्र मिलिंद देवरा कॉंग्रेसच्या तिकिटावर लढले अन् २०१४ मध्ये ही जागा शिवसेना ठाकरे गटाचे अरविंद सावंत यांच्याकडे आली. त्यातच आता मिलिंद देवरा यांनी शिंदे गटात प्रवेश केला असून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत अरविंद सावंत विरूद्ध मिलिंद देवरा अशी लढत अपेक्षित आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“२६ जानेवारीला मराठा आंदोलन मुंबईत धडकणार ,” कुठे मुक्काम कुठे जेवण ? जरांगे पाटलांनी दिली माहिती
हेही वाचा.मोठी बातमी…! “एक फोन आला अन्…. उद्धव ठाकरेंच्या घराबाहेर सुरक्षा वाढवली
हेही वाचा…“मोदी नकोच, अन् मोदींसोबतचे ढोंगीपण नको, “शिवसेनेच्या धर्मवीरांच्या ठाण्यात लागले बॅनर
हेही वाचा…“छातीठोकपणे सांगतो माझा परिचय श्रीराम सेवक आणि कारसेवक”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
हेही वाचा…शरद मोहोळ हत्याप्रकरणी आणखी एका मुख्य आरोपीला अटकेत, पनवेलच्या फार्महाऊसवर पोलिसांनी ठोकल्या बेड्या