मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातील उमेदवारांची घोषणा आज प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. जयंत पाटील यांनी यावेळी पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. याआधी महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि ठाकरे गटाने आपले उमेदवार जाहीर केले होते. कॉंग्रेसने ८ तर ठाकरे गटाने एकूण सतरा उमेदवारांची घोषणा केली होती. यात आता शरद पवार गटाने पाच उमेदवारांची घोषणा केली आहे.
हेही वाचा…चंद्रपूरच्या जागेचा तिढा सुटला; प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार ; मात्र वडेट्टीवार समर्थक भाजपात दाखल
मुंबई येथील कार्यालयात जयंत पाटील यांनी आपल्या उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये वर्धा लोकसभेतून अमर काळे यांच्या नावाची घोषणा केली आहे. तर दिंडोरी लोकसभेतून भास्कर भगरे, बारामतीत सुप्रिया सुळे, शिरूर मधून अमोल कोल्हे, तर अहमदनगर मधून निलेश लंके यांच्या नावाची घोषणा जयंत पाटील यांनी केली आहे. यातच बाकी जागांची घोषणा काही दिवसानंतर करण्यात येईल असेही जयंत पाटील यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…”मी बाळासाहेबांचा सच्चा शिवसैनिक ;” भाजप प्रवेशावर अंबादास दानवेंचा पुर्णविराम
दरम्यान, दक्षिण नगर मधून निलेश लंके यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांनी शरद पवार आणि जयंत पाटील यांचे आभार मानले आहेत. सध्या आपल्या मतदारसंघात शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उभे टाकले आहेत. कांदा प्रश्न, बरोजगारीचा प्रश्न, तसेच पाण्याचा प्रश्न काही ठिकाणी उद्धभवला आहे. त्या सगळ्या प्रश्नांची सोडवणूक करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. अशी प्रतिक्रिया निलेश लंके यांनी दिलीय. यातच प्रत्येक तालुक्यात एमआयडीसी आणणारच असेही निलेश लंके यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…पवारांच्या शिष्टाईनंतर मोहिते-पाटील अन् आढळराव यांच्यात दिलजमाई ; कोल्हेंपुढे मोठी अडचण
हेही वाचा…सोलापुरात राम सातपुते सेफ झोनमध्ये तर प्रणिती शिंदेंना बसणार मोठा फटका ; मराठा समाजाचा मोठा निर्णय
हेही वाचा…नाशिकच्या जागेवरून महायुतीत वाद वाढला, भुजबळांच्या दाव्याने खळबळ, दुसऱ्या बाजूला मराठा समाजही आक्रमक
हेही वाचा…“शिवतारे जर असा युटर्न घेत असतील तर लोक त्यांना..”बारामतीतून माघार घेतल्याने शिवतारेंना पवारांनी डिवचलं
हेही वाचा…ना मुख्यमंत्र्यांचं ऐकलं, ना फडणवीसांचं ; ‘तो’ एक फोन आला अन् शिवतारेंनी बारामतीतून घेतली माघार