बुलढाणा : राज्यात मराठा आरक्षणासोबतच ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरूनही राजकीय चिखलफेक सुरु असून, विरोधी आणि सत्ताधारी पक्ष एकमेकांवर टीका करण्याची एकही संधी हातून सोडत नाहीयेत.
यातच आज, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि ओबीसी समाजाचे नेते नाना पटोले यांनी बुलढाण्यात पत्रकारांशी बोलताना, विरोधी पक्ष असलेल्या भाजपवर जोरदार टीका केली असून, ‘राज्यात भाजपने आपल्याला सत्तेची खुर्ची मिळावी म्हणून, ओबीसी समाजाचे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील आरक्षण घालवून, त्यांचं राजकीय नुकसान करण्याचं ‘पाप’ जाणूनबुजून केलं आहे,’ असा आरोप केला आहे.
तसेच, राज्याच्या विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही त्यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली असून, ‘राज्यातील भाजपचे पदाधिकारी कधी मराठा, कधी एससी-एसटी, तर कधी ओबीसी आरक्षणाचे मुद्दे पुढे करून, हे राज्य सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आज ना उद्या हे सरकार पडणार असे सांगून राज्यातल्या जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यांनी याच कारणासाठी ओबीसी समाजाचे राजकीय नुकसान करण्याचे पाप ठरवून केलं आहे,’ असा थेट हल्लबोल त्यांनी भाजप वर केला आहे.
यावेळी त्यांनकेंद्रावर देखील शरसंधान साधले असून, ‘४ राज्यातील निवडणुका घेण्यासाठी केंद्राने मार्चमध्ये, देश महामारीमुक्त झाला असल्याचे सांगितले. मात्र, त्याच महिन्याच्या अखेरीस देशात महामारीचा फैलाव मोठ्या प्रमाणावर झाला एवढा हाहाकार माजला. केंद्राने देशात त्याच वेळी योग्य उपाययोजना केल्या असत्या, तर आज ही परिस्थिती देशावर ओढवली नसती. मात्र, मोदी देशाचे पंतप्रधान नसून, प्रचारजीवी आहेत. त्यांनी देशातील जनतेला अंधारा ठेवले आणि त्यामुळे निष्पाप जनतेचा बळी गेला,’ असा आरोप देखील त्यांनी केला आहे.
Read Also :
- ‘आगमी पुणे महापालिका निवडणूकीसाठी गिरीशभाऊच असतील आमचे संकटमोचक …’
- ‘दुधापेक्षा पाणी महाग’; दुधाचा कॅन खांद्यावर घेऊन सदाभाऊ खोत थेट मंत्रालयाकडे
- ‘‘कुत्रा इमानी असतो, तो चोर आणि भामट्यांवरच भुंकतो हे लक्षात असू दे.’’ – भाजप
- गोकुळने शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याचे काम केले आहे; शरद पवार यांनी केली गोकुळची मनभरून प्रशंसा
- ‘भाजप अगदी ‘दूध के धुली’ आहे, त्यांना जे भुंकायचं आहे ते भुंकू देत’ – शिवसेना