पुणे : शिरूर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे. बाबुराव पाचर्णे यांचे वय 71 वर्षे होते. काही दिवसांपासुन ते गंभीर आजाराने ग्रस्त होते. गेल्या काही दिवसांत त्यांचा आजार बळावळा आणि प्रकृती ढासळली होती. त्यातच आज दुपारच्या सुमारास बाबुराव पाचर्णे यांच निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, पूत्र राहुल पाचर्णे, एक मुलगी, जावई, नातवंडे, चार भाऊ, पाच बहीणी असा परिवार आहे. पाचर्णे यांच्या निधनाने शिरूर तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
वाढदिवस शिवसेनेच्या आमदाराचा अन् घोषणा राष्ट्रवादीच्या आमदाराची
बाबुराव पाचर्णे यांनी 2004 ते 2009 आणि 2014 ते 2019 या कालावधीत शिरूर मतदार संघाचे नेतृत्व केले होते. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत त्यानी राष्ट्रवादीचे नेते अशोक पवार यांचा पराभव करत विजयी झाले होते. शिरूर तालुक्यात भाजपचा मोठा चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. त्यांच्या जाण्याने मतदारसंघातील भाजपला मोठा धक्का बसला आहे. काही दिवसांपुर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बाबुराव पाचर्णे यांची पुण्यातील रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती.
“तात्काळ बैठक बोलवा, अन्यथा लढा उभारावा लागेल”; संभाजीराजेंचा शिंदे सरकारला इशारा
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप नेते, माजी आमदार बाबुरावजी पाचर्णे यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतिशय वाईट वाटले. परवाच त्यांची भेट घेतली होती. शेती क्षेत्रात त्यांनी अनेक अभिनव प्रयोग केले. सेंद्रिय शेतीसाठी ते आग्रही असत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत, असं ट्विट करत श्रद्धांजली वाहिली आहे.
“शिवसेनेवर टीका करताना विरोधकांनी विचार करावा”; शिवसेनेचा भाजपवर हल्लाबोल
गंगा सहकार साखर कारखान्याचे संस्थापक संचालक असलेल्या पाचर्णे यांनी 1997 ते 99 या काळात ते जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केले होते. विद्याभारती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष असलेल्या पाचर्णे यांनी विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांवर प्रतिनिधित्व केले. तर काही काळ त्यांनी काँग्रेसचे तालुकाध्यक्षपदही भूषवले होते.
Read also
- “दुल्हन हम ले जायेंगे”, अन् IT ची देवगन स्टाईल धाड; तब्बल 390 कोटींची मालमत्ता जप्त
- “मग तुम्ही आता करुणा मुंडेंची माफी मागणार आहात का?”; भाजपचा राष्ट्रवादीला सवाल
- नितीश कुमारांनी वावटळ निर्माण केलंय, त्याच वादळात रूपांतर झालं तर..; शिवसेनेचा भाजपला इशारा
- “केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा भाजपसोबतची युती तोडणार”?
- “अतिवृष्टीग्रस्तांच्या राज्य सरकारने तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय फक्त”; अजित पवारांची सडकून टिका