मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेनेत उभी फुट पडली आहे. जवळपास दीड ते दोन महिने झाल्यानंतरही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून शिवसेनेतील नेते, पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. सुरूवातीच्या काळात उद्धव ठाकरे यांच्यासोबतच राहणार असल्याची शपथा घेणारे आता उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आहेत. उस्मानाबाद जिल्ह्याचे शिवसेनेचे माजी खासदार प्रा. रविंद्र गायकवाड यांनी मुंबईत एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला.
“दसरा मेळावा शिंदे गट घेऊ शकतो, मात्र शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा होणार”
सुरूवातीच्या काळात एकनाथ शिंदे यांनी बंड केला होता. त्यावेळी रविंद्र गायकवाड म्हणाले होते की, मी सच्चा शिवसैनिक आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहणार आहे. असं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे अनेकांकडून आश्चर्य व्यक्त केलं जातं आहे. खरं तर रविंद्र गायकवाड यांच्या शिंदे गटात प्रवेशासाठी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मध्यस्थी केली आहे. एकनाथ शिंदे तुमचा योग्य सन्मान करतील असं त्यांना म्हटलं होतं. यावेळी बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव, मावळचे खासदार श्रीरंग बारणे, आमदार संजय शिरसाट उपस्थित होते.
सुरत, गुवाहाटी आणि गोवा फिरून आल्यानंतरही…; राष्ट्रवादीने बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं
रविंद्र गायकवाड यांची विधानसभेची कार्यकिर्द मोठी आहे. सुरूवातीला ते 2004 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत केवळ 2800 मताने विजयी झाले होते. त्यानंतर दुसऱ्यांदा ते आमदार झाले. 2009 मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेने रविंद्र गायकवाड यांना उमेदवारी दिली. तत्कालीन राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांनी रविंद्र गायकवाडा यांचा पराभव केला. त्यानंतर ते 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 2 लाख 20 हजार मते घेत विजयी झाले होते.
“भविष्यात रूपाली ताई तुमचं सुद्धा चांगलं होऊ द्या ओक्के”; शहाजी बापू पाटलांचा टोला
दरम्यान, शिंदे सरकारमधील पक्ष प्रतोद भरत गोगावले यांच्या महाड येथील निवासस्थानी विकास गोगावले यांच्या उपस्थितीत डोणा महिन्यापूर्वी उद्धव ठाकरे यांनी नियुक्त केलेले रायगड जिल्हा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख विपुल उभारे, महाड विधानसभा अध्यक्ष वैभव मोरे, विभाग प्रमुख योगेश बक्कम, सचिव जितेंद्र तेटगुरे अशा प्रमुख पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. ठाकरेंची सेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ सोडण्यास तयार नसल्याने स्थानिक पातळीवर राजकारण करणे अडचणीचे होत असल्याचा आरोप प्रवेश कर्त्यांनी केला तर आलेल्यांचा सन्मान केला जाईल, अशी प्रतिक्रिया विकास गोगावले यांनी यावेळी दिली.
Read also
- “शिवसेनेशी गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये”; शिवसेनेचं राणेंना प्रत्युत्तर
- “संमेलन बघून कुंभमेळाची आठवण झाली”; गिरीश महाजन
- “शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या वर आमदारांना निवडून आणता आलं नाही”
- “गळीत हंगामात FRP शिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही”
- “आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे