मुंबई : भाजप आणि जनतेशी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केेली. तसेच त्यांनी मुख्यमंत्री पद देखील गद्दारी करून मिळवलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाही तर शिवसेनेशी खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली, अशी घणाघाती टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे. या टीकेला आता शिवसेनेने प्रत्युत्तर दिलं आहे.
सुरत, गुवाहाटी आणि गोवा फिरून आल्यानंतरही…; राष्ट्रवादीने बच्चू कडूंना पुन्हा डिवचलं
शिवसेना आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी विश्वासघात केला तेच खरे गद्दार आहेत. उद्धव ठाकरे हेच खरे मातोश्रीचे खरे बछडे आहेत. नारायण राणे यांना शिवसेनेतून हाकलून दिले होते. गद्दारी करणाऱ्यांनी म्याव म्याव करू नये. अशा शब्दात शिवसेनेचे माजी आमदार शिवाजीराव चोथे यांनी नारायण राणे यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
“भविष्यात रूपाली ताई तुमचं सुद्धा चांगलं होऊ द्या ओक्के”; शहाजी बापू पाटलांचा टोला
भाजप आणि जनतेशी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केेली. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद गद्दारी करून मिळवलं. भाजप सोबतच कडवट शिवसैनिक एकनाथ शिंदे सारख्या नेत्यांशी गद्दारी केली. आमदारांना कोणतीही मदत केली नाही. जी काय कामे केली ती फक्त आपले नातेवाईक आणि मातोश्रीसाठी केली. त्यामुळे खरे गद्दार उद्धव ठाकरे आहेत, असं केंद्रीय मंत्री नारायण राणे म्हणाले होते.
“शिवसेनेशी गद्दारी एकनाथ शिंदेंनी नाही तर उद्धव ठाकरेंनी केली”; नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
उद्धव ठाकरे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्य 10 वर्षे मागे गेलं आहे. राज्यात शिंदे सरकार हे गणरायाच्या कृपेने आले आहे. घरात राहून महाराष्ट्र चालवता येत नाही, असा टोला नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.
Read also
- “संमेलन बघून कुंभमेळाची आठवण झाली”; गिरीश महाजन
- “शरद पवारांनी महाराष्ट्र पिंजून काढला, पण 60 च्या वर आमदारांना निवडून आणता आलं नाही”
- “गळीत हंगामात FRP शिवाय महाराष्ट्रातील एकही कराखाना सुरू होऊ देणार नाही”
- “आमच्याकडे फक्त अडीच वर्ष शिल्लक आहेत, त्यामुळे…”; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
- “दसरा मेळावा शिंदे गट घेऊ शकतो, मात्र शिवतीर्थावर शिवसेनेचाच मेळावा होणार”