बीड : गेल्या काही दिवसांपासून मराठवाड्यात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली असून शेती वाया गेली आहे. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्यानंतर हैराण झालेल्या अंबाजोगाई येथील वयस्क शेतकऱ्याने आपल्या लहानग्या नातवासह जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. एका हातात नातू, दुसऱ्या हातात नुकसानीची मोळी आणि डोळ्यात अश्रू… अशा परिस्थितीत या शेतकऱ्याने जयंत पाटील यांच्याकडे आपली व्यथा मांडली. त्यावेळी जयंत पाटील यांनी या शेतकऱ्याला धीर दिला. घाबरू नका. सरकार तुमच्याबरोबर आहे, असं सांगत जयंत पाटील यांनी या शेतकऱ्याला धीर दिला.
कुणीही उठावं आणि चिखलफेक करावी हे सहन करणार नाही – हसन मुश्रिफ
अंबाजोगाई येथे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेची बैठक सुरू आहे. त्यासाठी जयंत पाटील अंबाजोगाई येथे आले होते. ही बैठक सुरू असतानाच कार्यकर्त्यांमधून मार्ग काढत या वयस्क शेतकर्याने जयंत पाटलांची भेट घेतली. पावसाने नुकसान झालेली मोळी घेऊन डोळ्यात अश्रू दाटलेल्या या शेतकर्याने भेट घेतली. हातात नुकसानीची मोळी घेऊन आलेल्या त्या शेतकऱ्याचे म्हणणे जयंत पाटील यांनी ऐकून घेतले व त्यांना घाबरु नका सरकार तुमच्या सोबत आहे, असा धीराचा शब्द दिला.
अंबेजोगाई येथील आढावा बैठकीत कार्यकर्त्यांमधून मार्ग काढत हे शेतकरी बांधव माझ्या भेटीसाठी आले होते. त्यांच्या हातात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेले पिक होते तर डोळ्यात अश्रू. या शेतकरी बांधवाची भेट घेतली, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. pic.twitter.com/lhCb25i3no
— Jayant Patil- जयंत पाटील (@Jayant_R_Patil) September 28, 2021
दरम्यान बीड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी पालकमंत्री धनंजय मुंडे हे करत असल्याचेही जयंत पाटील यांनी त्या शेतकऱ्याला सांगितले. शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे शासनाचे कर्तव्य आहे आणि शासन आपले कर्तव्य पूर्ण करत आहे अशा शब्दात त्या शेतकऱ्याला जयंत पाटील यांनी दिलासा दिला. गेले तीन दिवस मराठवाड्यातील जिल्हयांमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकर्यांच्या पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. केंद्रसरकारच्या कृपेने आधीच सोयाबीनचे भाव पडले आहेत. त्यात आता ही निसर्गाची अवकृपा झाली असून सर्वत्र पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
Read Also :
- रस्त्याच्याकडेला उभं राहून पूरपरिस्थितीची पाहणी करू नका, बांधावर उतरा – पंकजा मुंडेचा टोला
- पुरामुळे सीईटी हुकलेल्या विद्यार्थ्यांची पुन्हा परीक्षा होणार; उदय सामंत यांची माहिती
- गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना २२ जागा लढवणार – संजय राऊत
- एसटी पुरात बुडाली, तीन जन मेले, चालक बेपत्ता झाला; तरीही पालकमंत्री अजूनही वाऱ्यावरच
- पावसाने सगळ उद्धस्त केलं, राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा – नाना पटोले