राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार पक्षात बंडखोरी करणार असल्याच्या चर्चांना काल उधाण आले होते. एका वृत्तपत्राने दिलेल्या वृत्तानंतर राजकीय वर्तुळात अनेक तर्क-वितर्क लढवले गेले. मात्र, त्यानंतर अजित पवारांनी, “या बातम्यांमध्ये काहीही तथ्य नाही”, अशी स्पष्टोक्ती दिली. दरम्यान, यावरून आता मंत्री गुलाबराव पाटील यांनी मिश्मिल टीप्पणी केली आहे.
हेही वाचा… भावी खासदार राष्ट्रवादीचा? पुण्यात पुन्हा बॅनरबाजी..!
मला वाटते लग्नाची तिथी अजून जवळ आलेली नाही. गुणही जुळत नाही. त्यामुळे कोणती पुजा करावी लागते, हे एखाद्या ब्राह्मणाला विचारायला लागेल. पण वेळ येईल काळजी करु नका, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. तसेच अजित पवारांच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त खरंच आहे का? असे विचारलं असता, ही वेळ लवकरच येईल. दोघांची इच्छा आहे. पण गुण जुळत नसल्याचे ब्राह्मणांनी सांगितले आहे. त्यामुळे गुण आणि तिथी जुळले तर लग्नही धड्याक्यात होईल. लग्न झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया मीच देणार, असे सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केले.
हेही वाचा… अजित पवारांनी बोलवली महत्त्वाची बैठक; राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते देवगिरी बंगल्यावर ..!
दरम्यान, १९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्वाभिमानाने स्थापना झाली आहे. तेव्हापासून आम्ही काम करत आहोत.जीवात जीव आहे तोपर्यंत आम्ही पक्षाचे काम करत राहणार असल्याचे काल अजित पवार यांनी स्पष्ट केले होते. पण सध्या माझ्याबाबत एवढं प्रेम का ऊतू चाललं आहे? असा सवाल त्यांनी केला. विपर्यास करुन बातम्या दाखवल्या जात आहेत. प्रत्येकाने आपापले काम करत राहावे. आपापल्या भागात महाविकास आघाडी कशी वाढत जाईल यासाठी प्रयत्नकरावे, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना केले होते.
Read also
हेही वाचा… “अजितदादांनी जरी खुलासा केला असला तरी, योग्यवेळी राष्ट्रवादीतून बाहेर पडतील”
हेही वाचा… राज ठाकरेंना मोठा धक्का! ‘या’ नेत्याचा तडकाफडकी राजीनामा
हेही वाचा… अजित पवारांच्या खुलाश्यानंतरही शरद पवारांची सावध भूमिका; प्रत्येक आमदाराला फोन…
हेही वाचा… “अजित पवारांच्या स्क्रिप्टचे रायटर फडणवीस”; सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट