मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पुण्याच्या माजी आयुक्त रश्मी शुक्ला फोन टॅपिंग प्रकरणावरून जोरदार राजकारण सुरू आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील या अगोदर काही नेत्यांचे फोन टॅंपिंग केले जात असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे फोन टॅपिंगचा मुद्दा अजून एकदा चर्चेत आला आहे. यावरून काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला विरोधात 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे राज्यात आता नव्या प्रकरणाला वळण लागण्याची शक्यता आहे.
“एकनाथराव तुम्ही ती २५ आमदारांची यादी द्या! सरकार कसं बनवायचं मी तुम्हाला सांगतो”
फोन टॅपिंग प्रकरणी रश्मी शुक्ला यांची चौकशी सध्या कुलाबा पोलीस ठाण्यात सुरू आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर रश्मी शुक्ला या चौकशीला हजर झाल्या. त्यांच्यावर राज्य गुप्तवार्ता विभागामध्ये असताना फोन टॅपिंग केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांचा फोन टॅपिंग केल्याचा आरोप देखील त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. या प्रकरणी महाविकास आघाडी सरकारमधील काही नेते आक्रमक झाल्याचे बघायला मिळाले.
शेतकऱ्यांचा तळतळाट या सरकारला खाली खेचणार; वीजकापणीवरून माजी ऊर्जामंत्र्याचं वक्तव्य
याप्रकरणी नाना पटोले यांनी रश्मी शुक्ला यांच्यावर 500 कोटींचा दावा ठोकणार असल्याचं म्हटलं आहे. ते म्हणाले की, मी स्वत: सोमवारी 500 कोटीचा दावा रश्मी शुक्ला, डीजी, नागपुर सीपी यांच्यावर ठोकणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात व्यक्ती स्वातंत्र्यावर गदा येता कामा नये. तसेच सुत्रधारांचा पर्दाफाश महाविकास आघाडी सरकार केल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
गावसकर, सचिन विराटसारखे दिग्गज संन्यास घेतात; मग काॅंग्रेसची धुरा नव्या नेतृत्वाकडे का नाही?
दरम्यान, नाना पटोले पुढे म्हणाले, की रश्मी शुक्लांच्या माध्यमातून फोन टॅपिंग केलं गेलं. नेत्यांचे फोन टॅप करण्याचा गुजरात पॅटर्न समोर आणणार असल्याचंही ते म्हणाले. त्याचबरोबर आमच्या नेत्या सोनिया गांधी यांनी काम सुरू केलं आहे. जे जबाबदार असतील त्यांच्यावर कारवाई केली जात आहे. तसेच जी-23 यांनी काय वक्तव्य केलं त्यावर सामनातुन काय टीका झाली ते माहीत नाही,असंही ते म्हणाले.
Read also:
- दिशा सालीयन प्रकरणी राणे पिता पुत्राला जामीन मंजूर होताच; नितेश राणेंचा राज्य सरकारवर पलटवार
- काश्मिर पंडितांची वेदना जेवढी शिवसेनेला माहित आहे, तेवढी अन्य कुणालाही नाही: संजय राऊत
- “जी-23 म्हणजे काॅंग्रेसचे सडके कांदे”; संजय राऊतांची काॅंग्रेसवर खरमरीत टीका
- मराठीच्या मुद्द्यावरून मनसेचं पुन्हा ‘खळखट्याक’; आयपीएलसाठी परराज्यातून आणलेल्या सर्व बसेस फोडल्या
- अध्यक्षपद निवडणुकीचा प्रस्ताव राज्यपालांनी फेटाळला; सरकार विरुद्ध राज्यपाल संघर्ष पेटणार