पुणे : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्या दरम्यान मंदिरातील गर्दी टाळण्यासाठी पोलिसांनी वारकऱ्यांवर लाठीचार्ज केल्याने राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी राज्य सरकारवर जोरदार टिका केली आहे. यंदा कडक बंदोबस्त आणि नियमावली केली असून पास शिवाय मंदिरात प्रवेश दिला जात नाही आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्याचं दिसून आलं. या घटनेवरून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी अमोल मिटकरी यांनी केली आहे.
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, ‘नर्मदाबाई पटवर्धन’ म्हणून चालवत होता फेसबुक
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख असलेल्या टोप्या घालून काही वारकरी पालखी सोहळ्यात दिसून आलेत. यावरून अमोल मिटकरी यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे. कुठे फेडणार आहात हे पाप? वारी, धर्म पंथ व पक्ष विरहित असते, यामध्ये सुद्धा स्वत:च्या पक्षाचा व नावाचा प्रचार करत असाल तर हे अत्यंत वेदनादायी आहे. आम्हा वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रदूषित विचारसरणीची घुसखोरी बंद करा ही कळकळीची विनंती असंही त्यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा वारकरी आषाढीची पूजा करू देणार नाही
११ जून आळंदी येथे कोणताही लाठीचार्ज झालेला नाही, त्यामुळे न घडलेल्या घटनेचे राजकारण करू नका. आपल्यासाठी वारकऱ्यांची सुरक्षा सर्वाधिक महत्वाची आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गेल्यावर्षी चेंगराचेंगरी होऊन काही महिला जखमी झाल्या होत्या, तशी स्थिती निर्माण होऊ नये, याला पोलिसांचा प्रथम प्राध्यान्य होते असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
कुठे फेडणार आहात हे पाप ?वारी,धर्म पंथ व पक्ष विरहित असते, यामध्ये सुद्धा स्वतःच्या पक्षाचा व नावाचा प्रचार करत असाल तर हे अत्यंत वेदनादायी आहे. आम्हा वारकऱ्यांच्या श्रद्धास्थानामध्ये प्रदूषित विचारसरणीची घुसखोरी बंद करा ही कळकळीची विनंती 🙏🏼@Dev_Fadnavis pic.twitter.com/SFsQFU9LYs
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) June 12, 2023
READ ALSO :
हेही वाचा…” त्यामुळेच राऊतांकडून नितेश राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा, राणे-राऊत वाद हायकोर्टात पोहचला”
हेही वाचा…“शरद पवार प्रत्येक वेळी सांगतात, पण मोदीजीच निवडून येतात”, फडणवीसांचा टोला
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेऊन”, सामनातून अजित पवारांवर भाष्य