मुंबई : खासदार संजय राऊत सातत्याने पत्रकार परिषद घेऊन शिंदे गटावर हल्लाबोल करीत आहेत. त्यानंतर लगेचच भाजपचे नेते आणि आमदार नितेश राणे संजय राऊतांवर पत्रकार परिषद मधून पलटवार करीत आहेत. नितेश राणे संजय राऊतांवर जोरदार टिकास्त्र सोडत आहेत. यातच आता हा वाद हायकोर्टात पोहोचला असून संजय राऊतांनी नितेश राणे यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला आहे.
हेही वाचा…मुख्यमंत्री अन् उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अन्यथा वारकरी आषाढीची पूजा करू देणार नाही
गेल्या काही काळापासून संजय राऊत आणि राणे कुटुंबीयांमध्ये टीका रंगल्या आहेत. राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली की तातडीने नितेश राणे पत्रकार परिषद घेतात आणि राऊतांच्या टीकांना प्रत्युत्तर देतात. हा वाद आता हायकोर्टात पोहोचला आहे. राऊतांकडून राणेंवर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करण्यात आला आहे. राऊतांकडून भाजप आमदार नितेश राणेंना अब्रुनुकसानीची नोटीस पाठविली गेली असून येत्या ४ जूलैला त्यावर सुनावणी होणार आहे. नितेश राणेंना कोर्टात आपले म्हणणे मांडावे लागणार आहे.
हेही वाचा…संजय राऊतांनी ती चूक टाळली, अजित पवारांचं बोलणं लक्षात ठेवलं पाहिजे
दरम्यान, मागील काही दिवसापासून शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळत आहे. यातच संजय राऊत आणि नितेश राणे सातत्याने एकमेकांवर टिका करतांना दिसत आहेत. आता हा वाद हायकोर्टात पोहचला असून पुढे काय घडामोडी घडणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“शरद पवार प्रत्येक वेळी सांगतात, पण मोदीजीच निवडून येतात”, फडणवीसांचा टोला
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…वारकऱ्यांवर लाठीचार्ज..! “तशी स्थिती निर्माण होऊ नये म्हणून…” फडणवीसांचं मोठं वक्तव्य
हेही वाचा…“अजित पवारांच्या नेतृत्वाखालचा गट हा भाजपच्या दगडावर पाय ठेऊन”, सामनातून अजित पवारांवर भाष्य
हेही वाचा…शरद पवारांना धमकी देणारा पोलिसांच्या ताब्यात, ‘नर्मदाबाई पटवर्धन’ म्हणून चालवत होता फेसबुक