डोरंडा : बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि आरजेडी अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याच्या 5 वर्षांचा तुरुंगवासासह न्यायालयाने लालूंना 60 लाख रुपयांचा दंडही ठोठावला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षा सुनावण्यापूर्वी लालू प्रसाद यादव यांचा रक्तदाब आणि शुगर लेवल वाढली होती. त्यामुळे त्यांची प्रकृती खालावल्याचीही चर्चा आहे. लालू प्रसाद यांची किडनी सध्या फक्त 20 टक्के काम करत आहे. राजदचे ज्येष्ठ नेते अब्दुल बारी सिद्दीकी कोर्टातील व्हिडिओ कॉन्फरन्सिंग रूमबाहेर उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातून पार्थ पवार ‘साईड स्ट्राईक’; भूमिका ठरवण्याची हिच ती वेळ!
चारा घोटाळा हा इतिहासातील सर्वात मोठा घोटाळा मानला जात आहे. डोरंडा कोषागारातून 139.35 कोटी बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी न्यायालयाने 15 फेब्रुवारी रोजी लालू प्रसाद यांच्यासह 75 आरोपींना दोषी ठरवले होते, त्यापैकी 38 आरोपी वगळता इतर सर्व आरोपींना आधीच शिक्षा सुनावण्यात आली आहे. लालू प्रसाद आणि अन्य आरोपी डॉ. कृष्ण मोहन प्रसाद अजूनही RIMS मध्ये दाखल आहेत, तर 36 आरोपी बिरसा मुंडा मध्यवर्ती कारागृहात आहेत.
Fifth fodder scam case | CBI court in Ranchi sentences RJD leader Lalu Prasad Yadav to 5 years' imprisonment and imposes Rs 60 Lakh fine on him. pic.twitter.com/413701Rt5W
— ANI (@ANI) February 21, 2022
यापूर्वी लालू प्रसाद चाईबासा कोषागारातून 37.7 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी दोषी आढळले आहेत. या प्रकरणी त्यांना पाच वर्षांची शिक्षा झाली आहे. दुसरीकडे देवघर कोषागारातून 84.53 लाख रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या लालूप्रसाद यांना साडेतीन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर चाईबासा ट्रेझरीमधून 33.67 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी त्यांना पुन्हा पाच वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. दुमका कोषागारातून 3.13 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढल्याप्रकरणी लालूप्रसाद यांना सर्वाधिक शिक्षा झाली आहे. या प्रकरणी त्यांना सात वर्षांची शिक्षा झाली आहे. लालूप्रसाद यांना चारही खटल्यांमध्ये जामीन मिळाला आहे.
हे लोक चु, अशा चु* लोकांना देशात स्थान राहणार नाही; संजय राऊतांची जीभ घसरली
चारा घोटाळ्याचे सर्वाधिक चर्चेत असलेले प्रकरण म्हणजे दोरांडा तिजोरीतून अवैध पैसे काढण्याचे प्रकरण. या प्रकरणात बनावट पावत्यांद्वारे 139.35 कोटी रुपये बेकायदेशीरपणे काढण्यात आले. या प्रकरणातच स्कूटरवरून म्हशी आणि चारा घेऊन गेल्याचे प्रकरण समोर आले. हे संपूर्ण प्रकरण 1990-92 मधील आहे. अधिकारी आणि नेत्यांनी मिळून बनावटीचा अनोखा फॉर्म्युला तयार केल्याचे तपासात सीबीआयला आढळून आले आहे. बिहारमध्ये चांगल्या प्रतीच्या गायी आणि म्हशींचे उत्पादन करण्यासाठी 400 बैल हरियाणा आणि दिल्ली वरुन रांचीला नेण्यात आले होते.
14, 04,825, 163 बैल आणि 65 गाड्या विकत घेण्यात आल्या होत्या. म्हशी स्कूटरवरून घेऊन जाणाऱ्या बहुचर्चित चारा घोटाळ्यातील दोरांडा प्रकरणात लालूप्रसाद यांना शिक्षा झाली आहे. सीबीआयच्या विशेष न्यायालयाने लालूप्रसाद यांची सुनावणी घेतली. 15 फेब्रुवारीला लालूप्रसाद यांना दोषी ठरवण्यात आले होते. यापूर्वी चारा घोटाळ्याच्या पाच प्रकरणात त्यांना शिक्षा झाली आहे.
Read also:
- उस्मानाबाद जिल्हा बँकेत भाजपचा सुपडा साफ; महाविकास आघाडीचा १५-०ने मोठा विजय
- महाविकास आघाडीचा प्रयोग अपयशी होणार, भाजपच नंबर वन – देवेंद्र फडणवीस
- पुणे मनपा निवडणुकीसाठी भाजपाची प्रचारात आघाडी; चंद्रकांत पाटीलांचा नव्याने समाविष्ट गावात झंझावाती प्रचार
- च्युतिया, गांडू हे शब्द सौम्य भाषेतीलच; संजय राऊतांचा नवा जावई शोध
- नारायण राणे विरुद्ध मातोश्री संघर्ष; केंद्राने राणेंच्या ‘नीलरत्न’ बंगल्याचा घेतला बळी