मुंबई : गेल्या आठवड्याभरापासून शिवसेना विरुद्ध केंद्रीय मंत्री नारायण राणे हा संघर्ष तीव्र होताना दिसत आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांचे अलिबागमधील कोर्लई गावात १९ बंगले आहेत असा आरोप किरीट सोमैया यांनी केला होता. त्यानंतर झालेल्या शाब्दिक युद्धात शिवसेना सचिव मिलिंद नॉर्वेकर, खासदार विनायक राऊत विरुद्ध नारायण राणे असा संघर्ष पुन्हा पेटला. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या मुंबईमधील जुहू येथे असणाऱ्या ‘अधिश’ बंगल्याला मुंबई महानगरपालिकेकडून नोटीस धाडण्यात आली होती. महाविकास आघाडी सरकारकडून दबाव आणल्यामुळे ही नोटीस आली आहे असं नारायण राणे यांनी म्हटलं होतं.
“रिश्ते में हम आपके बाप लगते है”, संजय राऊतांचा किरीट सोमय्यावर खोचक निशाणा
हे सगळं सुरु असताना राज्य सरकार नव्हे तर केंद्र सरकारकडून नारायण राणे यांना एक जबर धक्का बसला आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा मालवण जिल्ह्यातील चिवला समुद्रकिनाऱ्यावर निलरत्न हा बंगला आहे. बंगला बांधताना सीआरझेड कायद्याचे उल्लंघन झाल्याची तक्रार एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने केली होती आणि आता यासंदर्भात कारवाईस सुरुवात झाली आहे.
एखाद्याला मुलगा झाला, तरी काही जण श्रेय घेतात; देवेंद्र फडणवीसांचा रोख कुणाकडे?
केंद्र सरकारच्या मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज नागपूर कार्यालयाने महाराष्ट्र कोस्टल प्राधिकरणाला कारवाई करण्याचे आदेश दिले आहे. केंद्रीय मंत्री असणाऱ्या राणे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. केंद्रात मंत्री असूनही केंद्र सरकारने त्यांच्याच मंत्र्याचा बंगला पाडण्याचे आदेश दिल्याने आता नारायण राणे काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे.मुंबई महानगरपालिकेने जेव्हा राणेंना बंगला पाहणी, मोजमाप केले जाण्याची नोटीस पाठवली होती तेव्हा राणेंनी अत्यंत आक्रमक भूमिका घेऊन पत्रकार परिषद घेतली होती. आता केंद्र सरकार विरुद्ध राणे अशीच आक्रमक भूमिका घेणार की मवाळपणे शांत राहणार ? अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली आहे.
Read also:
- च्युतिया, गांडू म्हणण्यापेक्षा एकदा शिव्यांची डिक्शनरीच देऊन टाका; किरीट सोमैयांचा संजय राऊतांना सल्ला
- हे लोक चु, अशा चु* लोकांना देशात स्थान राहणार नाही; संजय राऊतांची जीभ घसरली*
- पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातून पार्थ पवार ‘साईड स्ट्राईक’; भूमिका ठरवण्याची हिच ती वेळ!
- किरीट सोमय्यांचा तीन पैशांचा तमाशा; महापौर किशोरी पेडणेकर संतापल्या
- सिंधुदुर्गात आतापर्यंत ७ हत्या, राजकीय हत्यांची चौकशी करा; विनायक राऊतांची गृहमंत्र्याकडे मागणी