पुणे : कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीची घोषणा निवडणुक आयोगाने जाहीर केली आहे. या जागांसाठी भाजपकडून आपले उमेदवार जाहीर केले आहेत. कसब्यातून स्थायी समितीचे अध्यक्ष राहिलेले हेमंत रासने यांना तर चिंचवडमधून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना आपली उमेदवारी जाहीर केली आहे. ह्या निवडणुका बिनविरोध व्हाव्या, साठी भाजपकडून केली जात आहेत. यातच आता शिंदे गटाचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी देखील राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विनंती केली आहे.
कसबा आणि चिंचवड पोटनिवडणक बिनविरोध व्हावी, यासाठी भाजपकडून राजकीय पक्षांना विनवणी केली जात आहे. यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना फोन केला होता. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील सर्वपक्षीय नेत्यांना कसबा पेठ आणि चिंचवड पोटनिवडणुक बिनविरोध होण्याची मागणी केली आहे. यावर आता दिपक केसरकर यांनी देखील भाष्य केलं आहे.
“त्यांनी आता साधा नागपुरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा”, एकनाथ खडसेंनी डिवचलं
निवडणुक बिनविरोध व्हायला हवी. ती महाराष्ट्राची पंरपरा आहे. पुर्वी ती खंडीत झाली होती. तेव्हा शरद पवार यांनी स्वत: पुढाकार घेऊन परंपरा पुन्हा सुरू केली होती. शरद पवार हे सर्वांचेच नेते आहेत. त्यामुळे यावेळी ते ही निवडणुक बिनविरोध करण्यासाठी पुढाकार घेतील, अशी मला खात्री आहे.
Read also
- “नव्या सरकारने 40 आमदारांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं,” अजित पवारांनी पुन्हा डिवचलं
- “मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना फोन, तरीही कसब्यातून लढणार ;” नाना पटोलेंनी शड्डू ठोकला
- “नाराजी, खंत, तरीही आदेश मान्य, हेमंत रासनेंनी घेतली शैलश टिळकांची भेट”
- “नाना भाऊ काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं उघडपणे काम करताहेत,” राष्ट्रवादीचा नाना पटोलेंवर आरोप
- “ठाकरेंच्या रिफायनरी विरोधामुळे कोकणाने 1 लाखांचा रोजगार गमावला,” फडणविसांचा गंभीर आरोप