मुंबई : नव्या सरकारने बऱ्याच जणांना मंत्रीपदाचं गाजर दाखवलं आणि आपल्यासोबत घेतलं. त्यापैकी प्रत्येकाला मंत्रीपदाचं गाजर दाखवलं होतं. मंत्रीपदाच्या आशेने 40 बंडखोर आमदारांपैकी बऱ्याच जणांनी नवीन सुट शिवून घेतले. त्यांना आता त्यांची बायको विचारते या सुटची घडी कधी मोडणार? यांनी नवसे केले, अभिषेक करत बसलेत. पण नवस फेडायला अजून मंत्रीपद काही मिळालेलं नाही. मंत्रीपद मिळाल्यावर नवस फेडायला येईन असं म्हणाले होते. पण राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही आणि यांना मंत्रीपद मिळालं नाही. असा खोचक टोला राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी लगावला.
“त्यांनी आता साधा नागपुरचा आमदार तरी निवडून आणून दाखवावा”, एकनाथ खडसेंनी डिवचलं
राज्यात एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडाळी केल्याने 40 आमदारांनी ठाकरेंची साथ सोडली. त्यांच्यासोबत 10 अपक्ष आमदार देखील गेलेत. बंडाळी केल्यानंतर शिंदेंनी थेट गुवाहाटी गाठलं, अन् तेथील कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. परंतु त्यांच्या मंत्रिमंडळाचा अजूनही दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. त्यावरून अजित पवारांनी भाजपवर निशाणा साधला.
“नाना पटोले ते भाजप, शरद पवार, अजित पवार, उद्धव ठाकरे.;” सत्यजीत तांबें कुणाबद्दल काय काय म्हणाले
पुढे बोलतांना अजित पवार म्हणाले की, माझ्या जिल्ह्यात येणारा 2 लाख कोटी रूपयांची गुंतवणुक असलेला प्रकल्प गुजरातला नेला. या प्रकल्पाद्वारे 2 लाख तरूणांना रोजगार मिळाला असता. राज्यातले अनेक मोठमोठे प्रकल्प परराज्यात पळवले जात आहेत. घटनाबाह्य सरकार केवळ आश्वासन देतंय की दुसरे मोठे प्रकल्प राज्यात येणार आहेत. परंतु तसं होईल असं दिसत नाही. कारण असे प्रकल्प राज्यात आणायला धमक लागते, जी या सरकारमध्ये नाही. असंही ते म्हणाले.
Read also
- “मुख्यमंत्र्यांचा पटोलेंना फोन, तरीही कसब्यातून लढणार ;” नाना पटोलेंनी शड्डू ठोकला
- “नाराजी, खंत, तरीही आदेश मान्य, हेमंत रासनेंनी घेतली शैलश टिळकांची भेट”
- “नाना भाऊ काॅंग्रेसमध्ये राहुन भाजपचं उघडपणे काम करताहेत,” राष्ट्रवादीचा नाना पटोलेंवर आरोप
- “ठाकरेंच्या रिफायनरी विरोधामुळे कोकणाने 1 लाखांचा रोजगार गमावला,” फडणविसांचा गंभीर आरोप
- “भाजपने अंधेरीत उमेदपणा दाखवला, तोच आता आघाडीने दाखवावा”, पोटनिवडणुका बिनविरोध होण्यासाठी राज ठाकरेंचं पत्र