पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुडीपाडव्याच्या दिवशी मेळाव्यात वादळी भाषण करत महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केलीय. सरकारवर टीका करत असताना त्यांनी हिंदुत्वाचा मुद्दा हाती घेतला. हिंदुत्वावरून थेट मुस्लिम समाजावर टीका करत जर ते भोंगे उतरवणार नसतील तर आम्ही देखील समोरच जास्तीच्या आवाजात हनुमान चालीसा पठण करू असं देखील त्यांनी म्हटलं. याचा परिणाम मनसेच्या काही नेत्यांना भोगावा लागणार असं वाटत असताना आता पुण्यातून मनसेचे नगरसेवक आणि गटनेते वसंत मोरे यांनी राज ठाकरेंच्या मुस्लिमविरोधी वक्तव्यांवरून नाराजी व्यक्त केलीय. राज ठाकरेंच्या हिंदुत्वादी भूमिकेचा फटका पुण्यातील काही नगरसेवकांना बसण्याची शक्यता आता वर्तवली जातीय.
“ते अज्ञान लोक पंपावर पळून गेले की कदमवाडीला?”; सतेज पाटलांचा भाजपला खोचक सवाल
याविषयी मनसेचे पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक आणि गटनेते वसंत मोरे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. माझ्या आणि नगरसेवक साईनाथ बाबर यांच्या प्रभागात मुस्लीम बहुल भाग जास्त आहे. राज साहेबांनी केलेल्या वक्तव्यामुळे आम्हाला विपरीत परिणामाला सामोरे जाऊ लागू शकते. सध्या तरी मी माझ्या प्रभागात शांतात कशी राखून ठेवता येईल याकडे लक्ष देऊन आहे. मी कोणतीही वेगळी भूमिका घेणार नाही. मात्र मला आता काय करावे ? हेच कळेनासे झाले आहे.
राज ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यांवर मुस्लिम समाज नाराज! पुण्यात मनसेच्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
काहीही झालं तरी एक गोष्ट मी सांगू शकतो की राज साहेब ठाकरेंच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेलाय. रमजानचे सध्या दिवस सुरु आहेत, त्यामुळे मी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. मी राज ठाकरे साहेब यांच्यावर नाराज नाही, पण काय भूमिका घ्यावी, हे मला कळत नाही, अशी जाहीर कबुली वसंत मोरे यांनी माध्यमांना दिलीय.
“जो हिन्दू हित की बात करेगा, वही देश पर राज करेगा”; भाजप नेत्याचं खळबळजनक वक्तव्य
राज ठाकरेंनी केलेल्या भाषणाला भाजप आणि भाजपचे मित्रपक्ष सोडले तर सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आलीय. सध्या महागाई, बेरोजगारी, पेट्रोल-डिझेल दरवाढ यासह विविध प्रश्न असताना धार्मिक, संवेदनशील मुद्दे उचलून समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न राज ठाकरे करत असल्याची टीका सत्ताधारी महाविकास आघाडी आणि केली आहे. राज ठाकरेंनी आगामी निवडणूक डोळ्यावर ठेऊन जरी हिंदुत्वाचा मुद्दा पुढे केला असला तरी मनसेच्या काही नेत्यांना याचा जोरदार फटका बसू शकतो, याची प्रचिती पुण्यातील पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावरून मनसेला आली असेल. आता येणाऱ्या निवडणुकीत मनसेला फायदा होणार की तोटा ? हे जनतेच्या मतदानावर ठरणार आहे.
Read also:
- “गुढीपाडव्याच्या सभेत फायरब्रॅंड नेत्याला काय झालं? रूपाली पाटलांची राज ठाकरेंच्या भाषणांवर प्रतिक्रिया
- शिवसेनेचे 18 खासदारांपैकी 14 खासदार आमच्या संपर्कात; प्रसाद लाड यांचा दावा
- कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही; रिपाइंची राज ठाकरेंविरोधात कारवाई करण्याची मागणी
- राज ठाकरेंचा मशिदीवरील भोंग्यांना विरोध; पुण्यात वसंत मोरेंनी उचललं महत्त्वाचं पाऊल
- कोल्हापूरात राजकीय आखाडा तापला; प्रचारासाठी मैदानात उतरली युवा नेत्यांची फौज