मुंबई : केंद्रीय निवडणुक आयुक्तांनी १५ राज्यातील ५६ जागांसाठी निवडणुक घोषित केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील ६ जागांवर निवडणुक होणार आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी राज्यसभा निवडणुकीसाठी मतदान होणार असून त्याच दिवशी या निवडणुकीचा निकाल लागणार आहे. सध्या राज्यात महायुती विरूद्ध महाविकास आघाडी असा सामाना रंगणार असून या सहाही जागांसाठी आता राजकीय गणितं कसं असणार ? याची राजकारणात जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
भाजपचे विद्यमान खासदार नारायण राणे, प्रकाश जावडेकर, व्ही. व्ही. मुरलीधरन हे खासदार तर शिवसेना ठाकरे गटाचे अनिल देसाई. कॉंग्रेसचे खासदार कुमार केतकर आणि राष्ट्रवादीच्या खासदार वंदना चव्हाण निवृत्त होणार आहेत. त्यांना पुन्हा संधी दिली जाईल का ? की त्यांच्या जागी अन्य कुणाला संधी दिली जाईल. याची चर्चा सध्या दोन्ही बाजूंनी सुरू झाली आहे.
हेही वाचा…“लाखांत नाही तर कोटीत निधी आणतो, तुमच्यासारखं दाळ व गुळवाल्यांच्या..,” निलेश लंकेंचा विखेंना अप्रत्यक्ष टोला
राज्यात सध्या भाजप आणि शिवसेना या पक्षातील प्रत्येकी दोन आमदारांचे निधन झाल्यामुळे सध्या विधानसभेच्या आमदारांची संख्या २८६ झाली आहे. त्यामुळे २८६ भागिले ६ आणि अधिक एक असे मिळून राज्यसभेच्या उमेदवाराला विजयासाठी ४०.० मतांची आवश्यकता असणार आहे. यातच भाजपकडे सध्या १०४ आणि अन्य १३ अपक्षांची मतं मिळून भाजप ३ जागा सहजपणे निवडून आणू शकते. तर शिवसेनेकडे ३९ आमदार आणि १० अपक्षांची मतं मिळून शिंदे गटाला एक जागा मिळण्याची शक्यता तर दुसऱ्या बाजूला कॉंग्रेसकडे ४५ आमदाराचं संख्याबळ असून कॉंग्रेसची एक जागा निवडून येण्यास काहीही अडचण येणार नाहीत.
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादी कॉंग्रेसकडे ५३ आमदार असून अजित पवार गटाला ४३ आमदारांचा पाठिंबा आहे. त्यामुळे अजित पवार गटाच्या वाटेला एक जागा मिळू शकते. ही निवडणूक अशा पद्धतीने बिनविरोध होऊ शकते. परंतु सहाव्या जागेसाठी भाजप आणि महाविकास आघाडीने प्रयत्न केले तर मतांच्या फोडाफोडीचं राजकारण पुन्हा एकदा बघायला मिळू शकते. यातच महाविकास आघाडीतील ठाकरे गट आणि शरद पवार गटातील एकूण आमदारांची संख्या ही २५ पेक्षा जास्त नसून त्यांना अपक्षांची मदत मिळाली तर ही संख्या ४० ते ४१ होऊ शकते.
परंतु या निवडणुकीत आता विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयानुसार शिवसेना ही एकनाथ शिंदेंची असून त्यामुळे त्यांनी नियुक्त केलेले प्रतोद भरत गोगावले यांचा व्हिप शिवसेनेच्या आमदारांना लागू होईल. यामध्ये ठाकरे गटाला मोठी अडचण ठरणार आहे. तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रवादीचं प्रकरण अजूनही विधानसभा अध्यक्षांकडे प्रलंबित आहे. निवडणुक होईपर्यंत निकाल लागला तर व्हीपचा मुद्दा राहणार नाही. परंतु निकाल लागला नाही तर हा वाद होण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…नवनियुक्त पोलीस आयुक्त ‘अमितेश कुमार’ यांनी पुणे पोलीस आयुक्त पदाचा स्वीकारला पदभार
हेही वाचा…तुमची किळस येते शेलार, तुम्हाला मानवजन्म दिल्याचा परमेश्वरालाही पश्चाताप होत असेल राष्ट्रवादीची जहरी टिका
हेही वाचा…“संजय गायकवाडांच्या मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे”, रूपाली पाटील आक्रमक
हेही वाचा…“आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही ?” पुण्याच्या नवीन विमानतळावरून ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील धोरणांतुन देशाच्या विकासाला चालना”, डॉ. नीलम गोऱ्हे