नागपुर : मनसे अध्यक्ष बऱ्याच कालावधीनंतर पक्षबांधणीसाठी नागपुर दौऱ्यावर आले आहेत. सकाळा त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. त्यानंतर दुपारी त्यांनी 12 वाजता पत्रकार परिषदे घेत विदर्भातील मनसेची सर्व महत्वाची पदं बरखास्त करण्यात आल्याची घोषणा केली आहे. तसेच त्यांनी राज्यातील अनेक प्रश्नांबाबत त्यांनी पत्रकारांना उत्तर दिली आहेत.
सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप
महाराष्ट्रातील जनतेसोबत मी आजपर्यंत इतकी प्रतारणा कधी पाहिली नाही. काय चाललंय काही माहिती नाही. कोण कुणासोबत जातं. कोण विरोधी पक्षात बसतं. कोण काय करीत आहेत ? याचा काहीच पत्ता लागत नाही. युतीकरून आघाड्या करून तुम्ही निवडणुका लढविता. मतदार ज्यावेळी दोन दोन तास रांगेत उभं राहुन मतदान करतात. त्यानंतर त्याचा निकाल लागतो. मग सकाळी जाऊन कुणीतरी शपथविधी करतं. मग भाजप आणि राष्ट्रवादी काॅंग्रेस एकत्र येतात. ते दोन तासात फिसकटतं. त्यानंतर शिवसेना, काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येतात. ही गोष्ट अजून मला काही समजलीच नाही असंही राज ठाकरे म्हणाले.
त्यानंतर त्यांनी राज्यात शिवसेना आणि भाजप मध्ये झालेल्या युतीसंदर्भात देखील भाष्य केलं. तसेच मध्यंतरी भाजप आणि शिवसेना युतीमध्ये शिवसेनेचे जास्त आमदार निवडून आले होते. त्यावेळी भाजपने कधीच मुख्यमंत्री पदासाठी दावा केला नाही. त्यानंतर युतीत फार्म्युला ठरलेला असताना उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रीपदासाठी दावा का केला? असा देखील त्यांनी म्हटलं आहे.
अजब सरकार..! “मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल तर..;”धनंजय मुडेंची टिका
दरम्यान, नागपुर शहर आणि जिल्ह्यातील आमचे जे काही सेल्स आहेत. महत्वाची पदं आहेत ती बरखास्त करत आहे. घटस्थापनेच्या दिवशी नवी कार्यकारणी जाहीर करेन. आता 27 सप्टेंबरला पदाधिकाऱ्यांची मुंबईत बैठक आहे. त्यानंतर 27 तारखेला आमचे काही नेते नागपुरात येतील. नवरात्रीनंतर मी कोल्हापुरमार्गे कोकण दौरा करणार आहे. त्यानंतर दोन दिवसांसाठी मी पुन्हा नागपुरात पक्ष बांधणीसाठी येणार आहे. असंही राज ठाकरे म्हणाले.
Read also
- “शिवाजी पार्क म्हणजेच शिवसेना असं समीकरण”; दसरा मेळाव्याबाबत शरद पवारांचं मोठं वक्तव्य
- “आपल्याला हा गड पुन्हा जिंकायचा असेल तर प्रत्येकाला पक्षात समाविष्ट करून घ्या”; जयंत पाटील
- “भास्कर जाधव यांची अवकात काय? हा नाच्या आमदार”; रामदास कदमांचा हल्लाबोल
- “सोमय्यांना तोंड लपवत फिरण्याची वेळ फडणवीसांनी त्यांच्यावर आणली”; रूपाली पाटलांचा खोचक टोला
- “बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंंत्री अन् मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला”; रामदास कदम