रत्नागिरी : शिवसेनेचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांची दोन दिवसाआधी कोकणात सभा होती. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर चांगलाच निशाणा साधला. त्यानंतर शिवसेनेचे नेते आणि भास्करराव जाधव यांची देखील सभा पार पडली. त्या सभेत त्यांनी बंडखोर आमदार रामदास कदम यांच्यावर टिका केली. त्याला आता रामदास कदम यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“शिंदे-फडणवीस सरकार बेशिस्तपणे वागतात, अन् ते फक्त अजित दादांना घाबरतात”; धनंजय मुंडे
भास्कर जाधव यांची अवकात काय? भास्कर जाधव हा नाच्या आमदार आहे. चिपळूनचे चीनपाट नाच्या आमदार भास्कर जाधव याची अवकात आहे का? आपण त्याचे कधी पाय धरले? आपण केशवराव भोसले यांच्या गाडीवर ड्राईव्हर होतो असे बोलतो ते केशवराव भोसले अजून जिवंत आहेत त्यांना विचारा अस रामदास कदम यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर रामदास कदम यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.
“शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील, पण मंत्रिपद केव्हा मिळणार माहीत नाही?” बच्चू कडू
आदित्य ठाकरे हे महाविकास आघाडी सरकारच्या काळात पर्यावरण मंत्री असताना त्यांनी प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे 100 कोटी रूपये घेतले. असा गंभीर आरोप रामदास कदम यांनी केला आहे. त्याचबरोबर आपण यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना एक पत्र पाठवून याप्रकरणाबाबत चौकशी करण्याची देखील मागणी केली आहे. असं देखील रामदास कदम यांनी म्हटलं आहे.
“ताई अजून तुम्ही एवढ्या मोठ्या झाल्या नाहीत”; मनसेचा ‘त्या’ ट्विटवरून टोला
दरम्यान, 100 खोके कुणाकडून घ्यायचे हे त्यांना चांगल्याने माहित आहे. कोकणात येऊन गद्दार आणि खोक्यांची भाषा 100 खोके घेणाऱ्या आदित्य ठाकरे यांनी सांगू नये. आत्मपरिक्षण केलं तर एवढं वणवण भटकण्याची गरज पडणार नाही. अडीच वर्षात कधी बाहेर पडले नाहीत. तुम्ही माझ्या बाबतीत तेच केलं. आठ दिवस माझअया बाजूला येऊन बसलात. काका काका म्हणत शिकले. प्लास्टिक बंदीचा कायदा मीच केला म्हणाले. बाबा मुख्यमंत्री मला बाजूला केलं. माझं खातं घेतलं. याला गद्दारी म्हणत नाहीत का? असा सवाल त्यांनी केला आहे.
Read also
- “सोमय्यांना तोंड लपवत फिरण्याची वेळ फडणवीसांनी त्यांच्यावर आणली”; रूपाली पाटलांचा खोचक टोला
- “बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंंत्री अन् मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला”; रामदास कदम
- सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप
- “शिंदेंनी मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतल्याचं फडणवीसांना पचलं नाही, म्हणून ते…;”रूपाली पाटलांचा खोचक टोला
- अजब सरकार..! “मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल तर..;”धनंजय मुडेंची टिका