नगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज अहमदनगर शहर व जिल्ह्याच्या संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतला. यावेळी जयंत पाटील यांनी जिल्ह्यातील तालुका व विधानसभा मतदारसंघनिहाय सभासद नोंदणी अभियानाची माहिती घेतली. तसेच जिल्ह्यातील किती ठिकाणी महिन्याच्या पहिल्या शनिवारी ‘एक तास राष्ट्रवादीसाठी’ हा उपक्रम राबविला जातो, याचा देखील आढावा घेतला.
अजब सरकार..! “मंत्री करायला जर दोन महिन्यांचा काळ गेला असेल तर..;”धनंजय मुडेंची टिका
पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले, आपल्या पक्षाची जास्तीत जास्त सभासद नोंदणी होणे आवश्यक आहे. यासाठी मोठ्या उत्साहाने युवक, विद्यार्थी, युवती विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. आपल्या पक्षाची संघटना वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात सभासद नोंदणी करणे गरजेचे आहे. ही आपल्यासाठी मोठी संधी आहे. अहमदनगर जिल्ह्याने नेहमीच राष्ट्रवादी विचारांना साथ दिली आहे. नगर जिल्हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. आपला हा गड पुन्हा जिंकायचा असेल तर सामान्यातील सामान्य घटकाला पक्षात समाविष्ट करून घेतले पाहिजे. अहमदनगर जिल्ह्यातून आपल्या पक्षाचे सर्वाधिक आमदार निवडून येतील याबाबत मला विश्वास असल्याचेही देखील ते म्हणाले.
“शिंदे-फडणवीस सरकार बेशिस्तपणे वागतात, अन् ते फक्त अजित दादांना घाबरतात”; धनंजय मुंडे
जनमताचा कौल सध्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे. महाराष्ट्रात ज्या पद्धतीने महाविकास आघाडी सरकार पाडलं गेलं ते लोकांना पटलेले नाही. त्यांनी केलेली गद्दारी ही लोकांना रुचलेली नाही. हे सरकार आल्यापासून महाराष्ट्राच्या अधोगतीचे निर्णय घेतले जात आहेत. नुकताच सेमी कंडक्टरचा प्रोजेक्ट महाराष्ट्राच्या हातातून हिसकावून घेतला गेला. फॉक्सकॉन’चा प्रोजेक्ट जर महाराष्ट्रात आला असता तर इतर कंपन्यांनीही प्रोत्साहित होऊन त्यांचे प्रोजेक्ट आपल्या राज्यात आणण्यासाठी इच्छा व्यक्त केली असती. परंतु मुख्यमंत्री हे दिल्लीश्वरांच्या इच्छेपुढे नमले, अशी टीका देखील त्यांनी केली.
“शिंदे साहेब आम्हाला मंत्री करतील, पण मंत्रिपद केव्हा मिळणार माहीत नाही?” बच्चू कडू
यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके, शहराध्यक्ष माणिकराव विधाते, आ. संग्राम जगताप, आ. आशुतोष काळे, आ. निलेश लंके, माजी आमदार नरेंद्र घुले, माजी आमदार राहुल जगताप, युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, प्रदेश उपाध्यक्ष घनश्याम शेलार, अंबादास गारुडकर, पुणे महिला विभागीय अध्यक्ष वैशाली नागवडे, कार्याध्यक्ष संदिप वर्पे, युवक जिल्हाध्यक्ष कपिल पवार, युवती जिल्हाध्यक्ष राजराजेश्वरी कोठावळे, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ओंकार गुंड, बाबासाहेब भिटे, सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, महिला पदाधिकारी आदी उपस्थित होते.
Read also
- “भास्कर जाधव यांची अवकात काय? हा नाच्या आमदार”; रामदास कदमांचा हल्लाबोल
- “सोमय्यांना तोंड लपवत फिरण्याची वेळ फडणवीसांनी त्यांच्यावर आणली”; रूपाली पाटलांचा खोचक टोला
- “बाप मुख्यमंत्री, मुलगा कॅबिनेट मंंत्री अन् मला काका-काका बोलून माझ्या जागेवर जाऊन बसला”; रामदास कदम
- सेवा पंधरवडा निमित्ताने मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते दाखले वाटप
- “शिंदेंनी मुख्यमंत्रीपद हिसकावून घेतल्याचं फडणवीसांना पचलं नाही, म्हणून ते…;”रूपाली पाटलांचा खोचक टोला