मुंबई : शिवसेनेचे नेते व राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेमुळे शिवसेनेत व राज्यात चालू असलेल्या राजकीय घडामोडींशी भारतीय जनता पार्टीचा काहीही संबंध नाही. तसेज अजूनपर्यंत त्यांचा भाजपाकडे सत्ता स्थापनेसाठी कोणताही प्रस्ताव सादर आला नाही, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले ते कोल्हापुरात पत्रकारांशी संवाद साधताना बोलत होते.
“राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत
भाजपाच्या निर्णयप्रक्रियेनुसार महत्त्वाच्या विषयांवर राज्याची कोअर कमिटी विचारविनिमय करून भूमिका निश्चित करते व केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस करते. त्यानंतर पक्षाचे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड अंतिम निर्णय घेते. शिवसेनेच्या दोन तृतीयांशपेक्षा अधिक आमदारांनी वेगळी भूमिका घेण्याच्या घडामोडीमागे भाजपा असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे, त्याविषयी आपली प्रतिक्रिया काय असे पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले की, देशामध्ये सर्वांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, तसेच ते शरद पवार यांनाही आहे. त्यानुसार ते मत व्यक्त करत असतात.
सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
गेल्या दोन दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींवर भाजपचाच हात असल्याचा आरोप होत होता. त्यावर आता भाजपचा यात कोणताही हात नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपा प्रयत्न करणार नाही. तथापि, अंतर्गत कलहामुळे हे सरकार कोसळेल, असे आपण यापूर्वी सातत्याने म्हणत होतो, याची त्यांनी पत्रकारांना आठवण करून दिली.
“बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात असेल असं मला वाटत नाही”; अजित पवार
दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना 24 तासात येण्याचं आवाहन केलं होतं. तसेच आम्हाला अपात्र करू नका, काॅंग्रेस, राष्ट्रवादीशिवाय होणाऱ्या सरकारलाच आमचा पाठिंबा आहे असं यांनी म्हटलं आहे.
Read also:
- निलंबित करण्याचं पत्र देताच शिंदे गटातील आमदारांनी गाठलं थेट विधानभवन
- “बंडखोरीमागे भाजपचाच हात, त्यांची आग्राहुन सुटका करावीच लागेल”; ठाकरेंचा आता भाजपवर हल्लाबोल
- ठाकरे अन् शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा; बंडखोर आमदारांना ठाकरेंचं आवाहन
- बंड मोडण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्यानंतर भाजपची मोठी खेळी; थेट राज्यपालांना पत्र
- “नीट शेतीची काळजी घेतली असती तर हातातलं पीक कोणी घेऊन गेलं नसतं “; राऊतांना भाजपचा टोला