मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या गटातील 17 बंडखोर आमदारांना निलंबित करण्याचे पत्र आज विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने देण्यात आलं आहे. संख्याबळ आमच्याकडे असताना तुम्ही कोणत्याही प्रकारची कारवाई करू शकत नाहीत. अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. अशातच आता शिंदे गटात सामील झालेले अपक्ष आमदार विनोद अग्रवाल आणि महेश बालदी यांनी थेट विधानभवन गाठलं आहे.
सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या बंडखोर आमदारांवर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. तसेच काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बंडखोर आमदारांना 24 तासात येण्याचं आवाहन केलं होतं. तसेच आम्हाला अपात्र करू नका, काॅंग्रेस, राष्ट्रवादीशिवाय होणाऱ्या सरकारलाच आमचा पाठिंबा आहे असं यांनी म्हटलं आहे.
“बंडामागे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा हात असेल असं मला वाटत नाही”; अजित पवार
एकुण 17 आमदारांना अपात्र करण्याची शिफारस शिवसेनेने विधानसभा उपाध्यक्षांना केली आहे. या पार्श्वभूमीवर अपत्र आमदार विनोद अग्रवाल आणि महेश बालदी हे दोन्ही अपत्र आमदार विधान भवनात पोहोचले होते. मी या सभागृहाचा सदस्य आहे. 12 आमदारांना अपात्र ठरवू नका अशी मागणी करण्यासाठी आम्ही आलो आहोत. सरकार स्थापण्यासाठी आजपर्यंत कोणीही आमच्याशी संपर्क साधलेला नाही. तरीही आम्ही एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देऊ,” असंही या दोघांनी स्पष्ट केलं.
सरकारमधून राष्ट्रवादी पाठिंबा काढून घेण्याच्या तयारीत; शरद पवारांच्या उपस्थित बैठक
आसाम मध्ये भयंकर पूर आला असतानाही त्यांची ‘महाशक्ती’ मात्र बंडखोर आमदारांना सांभाळण्यातच व्यस्त आहे. निर्लज्जपणाचा कळस ! असे ट्विट नाना पटोले यांनी केले आहे. एकनाथ शिंदे गटाने शिवसेना आणि अपेक्ष आमदारांना आपल्या बंडात घेण्यात यश आले आहे. आतापर्यंत 4 मंत्री आणि 47 आमदारांना यामध्ये सहभागी करून घेतले आहे. 12 आमदारांवर कारवाई करण्यात यावी यासाठी ही सरकारने मागणी केली आहे.
Read also:
- “बंडखोरीमागे भाजपचाच हात, त्यांची आग्राहुन सुटका करावीच लागेल”; ठाकरेंचा आता भाजपवर हल्लाबोल
- ठाकरे अन् शिवसेना नाव न वापरता जगून दाखवा; बंडखोर आमदारांना ठाकरेंचं आवाहन
- बंड मोडण्यासाठी शरद पवार मैदानात उतरल्यानंतर भाजपची मोठी खेळी; थेट राज्यपालांना पत्र
- “नीट शेतीची काळजी घेतली असती तर हातातलं पीक कोणी घेऊन गेलं नसतं “; राऊतांना भाजपचा टोला
- “राज्यात पेरण्या सुरु अन् कृषीमंत्री आसामच्या चिंतन शिबिरात, मुख्यमंत्री लक्ष द्या”, संजय राऊत