औरंगाबाद : राज्यात सध्या पाणी टंचाईची भीषणता सगळीकडेच जाणवू लागली आहे. यावरून औरंगाबादमध्ये सध्या पाण्यावरून राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. यावरून शिवसेनेला कोंडीत काढण्यासाठी भाजप राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेवर भव्य मोर्चा काढणार आहे. यावर आयएमआयचे खासदार इम्तियाज जलील यांनी मोर्चात सहभागी होणार असल्याचं म्हटलं आहे. यांसंदर्भात दिव्य मराठीने बातमी दिली होती.
“पावसाचं कारण सांगून मैदान सोडले, भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले”
औरंगाबाद शहारात सध्या आठ दिवसातून पाणी पुरवठा केला जात आहे. शहरात पाण्यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. त्याचाच आधार घेत आणि शिवसेनेला कोंडीत पकडण्याच्या हिशोबाने भाजपने रणनिती आखली आहे. त्यावर इम्तियाज जलील यांनी म्हटलं आहे की, देवेंद्र फडणवीस यांच्या या मोर्चाने औरंगाबादला पाणी मिळणार असेल तर आम्ही सर्व औरंगाबादकर या मोर्चात सहभागी होणार आहोत. जनतेच्या दुःखाच्या किंमतीवर हे स्वस्त राजकारण करण्याशिवाय दुसरे काही नाही, असंही त्यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना
भाजपने मोर्चा काढण्याचे नियोजन आखताच पालकमंत्री सुभाष देसाई यांनी तत्काळ पाणीपट्ट दोन हजार केली आहे. त्यामुळे भाजपने आता अगदी पन्ना प्रमुखांपासून ते मंत्र्यापर्यंत सगळ्यांना कामाला लावले आहे. ही योजना फसवी आहे. पाणी पट्टी निम्मी झाली, मात्र भाजपचे पदाधिकारी वॉर्डावॉर्डात बैठका घेत आहेत. मोर्चात सहभागी करून घेण्यासाठी प्रत्येक वार्डातील पन्ना- बुथप्रमुख, मंडळ, अध्यक्ष,शहाराध्यक्ष, आमदार, मंत्री आणि विविध विंगचे पदाधिकारी काम कऱत आहेत.
दरम्यान, सध्याच्या पाणी समस्येबरोबरच संथगतीने सुरू असलेले नवीन योजनेचे काम, मोर्चोची घोषणा करताच पाणीपट्टी चार हजारांवरून 2 हजारांवर करण्यात आली. मात्र ती अजूनही कागदावर आहे. बहुतांश भागांना टॅंकरने पाणी पुरवले जाते. टॅंकरचे दर कमी केले नाही. महिन्याला 700 म्हणजे वर्षाला आठ हजार रूपये प्रत्येक घरासाठी खर्च होतो, अशा विविध मुद्दांवरून देवेंद्र फडणवीस शिवसेनेला घेऱण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
Read also:
- “रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये”; गोपीचंद पडळकरांचा रोहित पवारांना सल्ला
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
- “एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
- “पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
- “महापालिकेच्या कुठल्याही वार्डात निवडणुक लढवून दाखवावी”; चित्रा वाघ यांना विद्या चव्हाण यांचं खुलं आव्हान