पुणे : राष्ट्रवादी काॅंग्रेसला राज्यातील ओबीसी आरक्षणाचा खुन केला आहे. शरद पवार यांच्या ह्यांच्या भावकी-रावकीला मंत्रीपद, आमदारक्या, खासदारक्या, कारखाने, महामंडळ, दुधसंघ वाटून झाले आता भाऊगर्दी झाली. म्हणून ओबीसींच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतल्या जागाही यांना पाहिजेत.असा हल्लाबोल भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी आरक्षणावरुन शरद पवार यांच्यावर केला आहे.
राज ठाकरेंची पुण्यातील सभा रद्द; राज ठाकरे लगेचच मुंबईकडे रवाना
ओबीसी समाजाचं घरं दिवसा रॉकेल ओतून पेटवून देण्याचं काम शरद पवार यांच्या नेृत्ववाखाली राष्ट्रवादी काॅंग्रेस करत आहे, असा आरोप देखील त्यांनी केला आहे. तसेच रोहित पवारांनी पुण्यात राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्त्यांना झालेल्या मारहाणीबाबत प्रतिक्रिया दिली होती. त्यावर बोलताना ते म्हणाले की, बाकी रोहित पवारांनी महाराष्ट्राला सुसंस्कृतपणा शिकवु नये.
गोपीचंद पडळकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर देखील हल्लाबोल केला आहे. जनतेला सर्व माहिती आहे. त्यामुळे खासदार सुप्रिया सुळे यांनी सर्व महिलांच्या बाबतीच एकच भूमिका घेणे गरजेचे आहे. पुण्यात शिवसेनेच्या उपनेत्यांनी आणलेल्या विषयावर तुम्ही काहीही प्रतिक्रिया दिली नाही. त्या मुलीने वांरवार तिच्यावर अन्याय, अत्याचार झाला असल्याचे सांगितले. परंतु तुम्ही उलटे भाजपच्या चित्रा वाघ यांच्यावर त्या मुलीला आरोप करायला लावले. त्यामुळे संस्कार शिकवण्याची गरज नाही. कारण जनता सर्व जाणून आहे.
“महिलांवर हात उगाराल तर हात तोडून हातात देऊ”; सुप्रिया सुळे संतापल्या
दरम्यान, महाराष्ट्र हा शाहु, फुले आणि आंबेडकरांच्या विचारांचा आहे. त्यामध्ये महिलांवरील अन्याय आम्ही सहन करणार नाही. आम्हाला गरज पडली तर न्यायालयात देखील जाऊ, आणि ऐकलं नाहीतर अशा लोकांचा हात तोडून हातात देऊ असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी पुण्यात झालेल्या राष्ट्रवादीच्या महिला कार्यकर्तीवरून भाजपच्या कार्यकर्त्यांना सुनावलं होतं.
Read also:
- “प्रयत्न करणे आपल्या हातात आहे”; OBC आरक्षणाबाबत अजित पवारांंनी दिली मोठी माहिती
- “एका रात्रीत हिंदुत्ववादी झाले अन् अयोध्येला निघाले, बृजभूषण लढवय्या माणूस”; संजय राऊत
- “पुरून उरेन तुम्हाला ‘चित्रा वाघ’ म्हणतात मला”; चित्रा वाघ यांचा राष्ट्रवादीला अप्रत्यक्ष टोला
- “महापालिकेच्या कुठल्याही वार्डात निवडणुक लढवून दाखवावी”; चित्रा वाघ यांना विद्या चव्हाण यांचं खुलं आव्हान
- “पावसाचं कारण सांगून मैदान सोडले, भोंग्याचे कारण सांगून देशपांडे पळाले”