मुंबई : इंग्लडमध्ये असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं आता भारतात आणली जात आहेत. मात्र यावरून आता शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी यावरून भाजपला काही प्रश्न केले आहेत. महाराष्ट्रात येत असलेली वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत? याचा खुलासा सरकारने करावा, अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी केली आहे. त्यावरून आता भाजपने ठाकरेंना जोरादार प्रत्युत्तर दिलं आहे.
हेही वाचा…शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारले जाणार, शिवछत्रपतींचे सुवर्ण मंदिर आणि जगातील सर्वात मोठा पुतळा
इंग्लंडहून छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं येत आहेत. परंतु ही वाघनखं कायमस्वरूपी आपल्याकडे राहणार आहेत का ? याबाबत प्रश्नच आहे. कारण ती वाघनखं केवळ तीन वर्षासाठी आपल्याकडे राहतील. असंही जीआरमध्ये म्हटलं आहे. मुळात ती शिवकालीन आहेत का ? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.
हेही वाचा…“आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आमदारकीचा पहिला राजीनामा देणार”, ‘या’ आमदाराने सरकारला दिला इशारा
दरम्यान, वय वाढले की बुद्धी वाढतेच असे होत नाही. मेंदूचा विकास होतो असेही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेस. तुझ्या या बुद्धीभ्रष्ट विधानामुळे मराठी माणूस संतापला आहे. आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे निपजल्याचे बघून वंदनीय बाळासाहेबांना खूप दुःख झाले असेल. दिल्लीच्या एका पप्पूने आधीच राजकारणात गोंधळ घातला आहे. आता तुझ्या रूपात मुंबईच्या ‘अप्पू‘ ची मूर्खांच्या नंदनवनात भर पडली आहे. अशी टिका भाजपने केली आहे.
आदुबाळा,
वय वाढले की बुद्धी वाढतेच असे नाही. मेंदूचा विकास होतो असेही नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करून तू देशातील जनतेच्या भावना दुखावल्या आहेस. तुझ्या या बुद्धीभ्रष्ट विधानामुळे मराठी माणूस संतापला आहे.
आपल्या कुटुंबातील हे कार्ट असे…
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) September 30, 2023
READ ALSO :
हेही वाचा…“नको असलेले नेते दिल्लीला पाठवण्याची भाजपची प्रथा”, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जंयत पाटलांचा टोला
हेही वाचा…“राज्याच्या पैशावर सहली करण्याचा भाजप सरकारचा डाव आदित्य ठाकरेंमुळे रद्द झाला”
हेही वाचा…अजित पवारांचं ‘ते’ व्यक्तव्य अन् शरद पवार गट निवडणूक आयोगात बाजी मारणार, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…राज ठाकरेंचे ‘२०’ शिलेदार लोकसभेचा सादर करणार अहवाल, 2 ऑक्टोंबरला बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…मध्यप्रदेश भाजपच्या हातून निसटणार, राजस्थानमध्ये अटीतटीची लढत, निवडणुकांचा सर्वात मोठा सर्व्हे आला समोर