मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपने कंबर कसली असून मोठी रणनिती तयार केली आहे. राज्यातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी कमीत कमी ४५ जागा जिंकल्या पाहिजेत, या हिशोबाने आता विधानसभांच्या कामगिरीवर भाजपकडून आमदारांना लोकसभेचं तिकीट दिलं जाणार आहे. यातच आता राज्यातील भाजपचे सात दिग्गज आमदार लोकसभा निवडणुक लढणार असल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. यावरून आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी भाजपला टोला हाणला आहे.
हेही वाचा…“आदिवासींमधून धनगर समाजाला आरक्षण दिल्यास आमदारकीचा पहिला राजीनामा देणार”, ‘या’ आमदाराने सरकारला दिला इशारा
महाराष्ट्रात जे नेते नको आहेत त्यांना दिल्लीत पाठवायची भाजपची प्रथा आहे. हा त्याचाच एक भाग असू शकतो. त्याच्या पलिकडे या योजनेला फार काही महत्व आहे असं काहीच दिसत नाही. एकीकडे मध्यप्रदेशची विधानसभा निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना विधानसबेच्या रिंगणात उतरवलं आहे. तर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्रात लोकसभा निवडणुक जिंकण्यासाठी भाजपने राज्यातले मंत्री आणि आमदार लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची योजना बनवली आहे. असं जयंत पाटील म्हणाले.
हेही वाचा…मोठी बातमी…! एक देश, एक निवडणुक २०२४ ला नाही तर ‘या’ वर्षापासून लागू होणार, ? विधी आयोगाचा मोठा खुलासा
मध्यप्रदेशात आगामी महिन्यात विधानसभा निवडणुकां होऊ घातल्या आहेत. या निवडणुकांमध्ये तीन केंद्रीय मंत्री आणि चार खासदारांना विधानसभेच्या निवडणुकीसाठी उतरवले जाऊन भाजप मोठी खेळी खेळण्याच्या तयारीत आहे. तर दुसऱ्या बाजूला केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनाही विधानसभेच्या आराखड्यात उतरविले जाण्याची शक्यता आहे. परंतु महाराष्ट्रात मात्र वेगळं गणित आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातील भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवार यांना चंद्रपूर, मंत्री गिरीश महाजन यांना रावेर, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंना वर्धा, आकोल्यातून आकाश फुंडकर, राम सातपूते सोलापूर, मंत्री रविंद्र चव्हाण किंवा संजय केळकर यांना ठाणे तर विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांना दक्षिण मुंबईतून तिकीट देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यासोबतच पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनाही लोकसभेच्या रिंगणात उतरविले जाऊ शकतात.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्याच्या पैशावर सहली करण्याचा भाजप सरकारचा डाव आदित्य ठाकरेंमुळे रद्द झाला”
हेही वाचा…अजित पवारांचं ‘ते’ व्यक्तव्य अन् शरद पवार गट निवडणूक आयोगात बाजी मारणार, राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…राज ठाकरेंचे ‘२०’ शिलेदार लोकसभेचा सादर करणार अहवाल, 2 ऑक्टोंबरला बोलवली महत्वाची बैठक
हेही वाचा…मध्यप्रदेश भाजपच्या हातून निसटणार, राजस्थानमध्ये अटीतटीची लढत, निवडणुकांचा सर्वात मोठा सर्व्हे आला समोर
हेही वाचा…शिवजन्मभूमी जुन्नरमध्ये उभारले जाणार, शिवछत्रपतींचे सुवर्ण मंदिर आणि जगातील सर्वात मोठा पुतळा