पुणे : ठाण्यातील महाप्रबोधन यात्रेत शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्री करत त्यांच्यावर हल्लाबोल केला. मात्र मोदी यांची मिमिक्री करत त्यांच्यावर टिका केल्याप्रकरणी अंधारे यांच्यावर ठाण्यात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यावरून भाजपने देखील त्यांच्यावर क़डाडून टिका केली आहे.
“ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी…”; उद्धव ठाकरेंनी उंचावली हाती मशाल
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मिमिक्रि करून राजकारणाचा स्थर किती खालच्या दर्जाला जाऊ शकतो. हे सुषमा अंधारे यांनी काल दाखवून दिलं आहे. शिवसेना संपावयाल कारणीभूत असणारे संजय राऊत सध्या तुरूंगात गेले. अन् सुषमा अंधारे यांच्या रूपाने शिवसेनेला पुन्हा एकदा संजय राऊत मिळाले. राजकारण हे भक्कम विचारसरणीवर चालतं. नौटकी आणि मिमिक्रीवर चालत नाही. त्यामुळे असे कितीही राजकीय विदुषक उदयाला आले तर त्यामुळे मोदींना याचा काहीच फरक पडणार नाही. तसेच त्यांनी देशाला विश्वगुरू बनवण्याचं स्वप्न पाहिलं आहे. ते करूनच दाखवतील असं भाजप महिला मोर्चाच्या नेत्या वर्षा डाहाळे यांनी म्हटलं आहे.
उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह दिल्यानंतर भुजबळ चर्चेत; छगन भुजबळ म्हणाले, “अनेकांचे रक्त आटलं…;”
ठाकरे गटाकडून ठाण्यात महाप्रबोधन यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शिवसेनेचे नेते आणि खासदार विनायक राऊत, आमदार भास्कर जाधव आणि सुषमा अंधारे यांच्यासह अनेक शिवसेनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी त्यांनी भाजप आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल करीत प्रखर शब्दात टिका केली. त्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“बाळासाहेबांच्या नावाची कुणीही चेष्टा करू नका”; अन् शहाजी बापू पाटील भडकले
या जाहीर मेळाव्यात प्रक्षोभक आणि चिथावणीखोर वक्तव्य करत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रतिमा मलीन केली असा आरोप शिंदे गटाचे नौपाडा येथील उपविभागप्रमुख बाळा गवस यांनी तक्रार दाखल केली आहे.
Read also
- “नको त्या गोष्टीमध्ये तुमचा वेळ वाया घालवू नका, कामं करा अगोदर”; रूपाली पाटलांनी फडणवीसांना खडसावलं
- शिंदेंना ढाल तलवार…! भाजपची ढाल, इडीची तलवार अन् जनतेवर वार..! ऱाष्ट्रवादीची टीका
- “पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही”; भाजपची ठाकरेंवर खरमरीत टीका
- अंधेरी निवडणुसाठी राष्ट्रवादी, काॅंग्रेस पाठोपाठ राजकीय पक्षांचा देखील ठाकरेंना पाठिंबा
- “पालघरच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या साधूंना नक्की न्याय मिळेल”; गिरीश खत्री