नाशिक : शिवसेना पक्षाच्या चिन्हावरून राजकीय वातावरण पेटले असताना त्याला निवडणूक आयोगाने काढलेल्या पर्यायावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपली भूमिका माध्यमांसमोर मांडली. यावेळी त्यांनी आपल्या राजकीय जीवनातील सुरुवातीच्या आठवणींना उजाळा दिला. शिवसेना पक्षात कार्यरत असताना संस्थेची नोंदणी केली नसल्यामुळे शिवसेना पक्षाला कोणतेही चिन्ह नव्हते. त्यावेळी मशाल हे चिन्ह वापरात आणले होते, असे भुजबळ म्हणाले.
“नाव, नेता अन् चिन्ह पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो..”; अंबादास दानवेंनी शिंदेंना फटकारलं
शिवसेनेने मशाल या चिन्हावर लढवलेल्या निवडणुकीत पक्षाचा प्रथम महापौर आणि आमदार मी झालो होतो, अशी माहिती त्यांनी दिली. पुढे निवडणूक आयोगाने ठाकरे-शिंदे गटात चिन्हावरून साधलेला मध्यबिंदू पाहिल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे या गटाला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पाठिंबा दिला. त्यामुळे अंधेरी येथील पोटनिवडूक ही उद्धव ठाकरे यांना अजिबात जड जाणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
“धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार”
मात्र ठाकरे – शिंदे गटातील वाद शिवसेना पक्षातील सर्वसामान्य शिवसैनिकाला क्लेष देणारा आहे, असे परखड मत छगन भुजबळ यांनी माध्यमांसमोर मांडले. शिवसेनेसाठी अनेकांनी बलिदान दिले आहे, अनेकांचे रक्त आटलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी तयार केलेल्या शिवसेनेच्या नावालाच आव्हान देणे आणि ते नाव रद्दबातल होत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे याचे शिवसैनिकाला जरूर दुःख आहे, असे ते म्हणाले.
Read also
- “बाळासाहेबांच्या नावाची कुणीही चेष्टा करू नका”; अन् शहाजी बापू पाटील भडकले
- “कालपर्यंत जे बाप चोरला म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारताहेत”
- “आज ‘हिंदुधर्मरक्षक’ देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं”; तुषार भोसले
- “पहा झोपड्या कंगालांच्या थरथरल्या भवताली, अन्यायाला जाळीत..;” सुषमा अंधारे
- शिंदे गट ‘रिक्षा’ चिन्हासाठी आग्रही..! शिंदेंनी आयोगाला पाठवले दोन मेल