मुंबई : काल निवडणुक आयोगाने उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाला आगामी निवडणुकीसाठी पक्षाचं नाव देण्यात आलं. उद्धव ठाकरे यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव देण्यात आलं आहे. यावरून राज्यातील राजकीय नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. यावर आता भाजपने उद्धव ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका तत्काळ घ्या…! जिल्हा परिषद सदस्य असोसिएशनची मागणी
कालपर्यंत जे बाप चोरला म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारत आहेत. एकनाथ शिंदे यांची शिवसेना हीच खरी बाळासाहेबांची शिवसेना आहे, हे निवडणुक आयोगानेही मान्य केल्यावर हे बाळासाहेब आमचे नाहीत, असे रडगाणे त्यांनी सुरू केले आहेत. याला बाप नाकारणे म्हणतात. असा टोला भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्यय यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
“शिव्या हासाडणारे सत्तारांनी सुचवलेलं कुत्रा निशाणी घ्या”; रूपाली पाटलांचा शिंदेंना टोला
नाव, नेता आणि चिन्ह पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो, तुमचे सुपर सीएम देवेंद्र फडणवीस आणि मातृसंस्था भाजप ला पटकन विचारून चिन्ह आज तरी अंतिम करा.. स्वत:चे असेही तुमच्याकडे काहीच नाही. असा खोचक टोला अंबादास दानवे यांनी शिंदे गटाला केला आहे. उद्धव ठाकरे यांनी सुरूवातीला त्रिशूळ, उगवता सुर्य आणि मशाल अशी चिन्हे सादर केली होती. परंतु शिंदे गटाने देखील तीच चिन्हे सादर केल्याने ती रद्द करण्यात आली.
“उद्धव ठाकरे ज्यावेळी सोनिया गांधी समोर झुकले, त्याचवेळी भाजपचा कार्यकर्ता म्हणून दु:ख झालं”
निवडणुक आयोगाने काल उद्धव ठाकरे यांना मशाल हे चिन्ह देण्यात आलं तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे राजकीय पक्षाचं नाव दिलं आहे. यातच शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना हे नाव दिलं आहे. आज शिंदे गटाने तळपता सुर्य, ढाल तलवार, आणि पिंपळाचे झाड हे तीन चिन्ह सादर केले आहेत. यावर आता निवडणुक आयोग निर्णय घेऊन शिंदे गटाला निवडणुकीसाठी राजकीय चिन्ह मिळणार आहे.
Read also
- “आज ‘हिंदुधर्मरक्षक’ देवेंद्र फडणवीसांनी करून दाखवलं”; तुषार भोसले
- “पहा झोपड्या कंगालांच्या थरथरल्या भवताली, अन्यायाला जाळीत..;” सुषमा अंधारे
- शिंदे गट ‘रिक्षा’ चिन्हासाठी आग्रही..! शिंदेंनी आयोगाला पाठवले दोन मेल
- “नाव, नेता अन् चिन्ह पाहणाऱ्या कॉपी बहाद्दर लोकांनो..”; अंबादास दानवेंनी शिंदेंना फटकारलं
- “धनुष्यबाण गोठवण्याचा नीचपणा केला, त्यांचा राजकीय अंत शिवसेनेच्या बाणानेच होणार”