मुंबई : राज्यात शिवसेना आणि धनुष्यबाणावरून राजकारण तापलेलं असताना भाजपने देखील यावर आपल्या प्रतिक्रिया देत आहे. निवडणुक आयोग जेव्हा अंतिम निर्णय देईल. तेव्हा शिवसेना आणि धनुष्यबाण हा एकनाथ शिंदेेंकडेच राहिल. असं वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. त्यावर आता राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी भाजपवर हल्लाबोल करत भाजपने दिलेल्या आश्वासंनाची यादीच देत सवाल उपस्थित केला आहे.
उद्धव ठाकरेंना ‘मशाल’ चिन्ह दिल्यानंतर भुजबळ चर्चेत; छगन भुजबळ म्हणाले, “अनेकांचे रक्त आटलं…;”
निवडणुक आयोग त्याच काम करेल. तुम्ही तुमची कामे विसरली आहात त्यामुळे तुम्हाला याची परत आठवण करून देत आहेत. असं म्हणत रूपाली पाटलांनी भाजपला सवाल केले आहेत. यामध्ये धनगर बांधवाना पहिल्या कॅबिनेटमध्ये एसटीचे आरक्षण, एसटी विलीनीकरण, ओबीसी आरक्षण, मराठा आरक्षण अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, इंदू मिल परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मारक कधी होणार ते अगोदर सांगा? असे सवाल त्यांनी उपस्थित केलेे आहेत.
“बाळासाहेबांच्या नावाची कुणीही चेष्टा करू नका”; अन् शहाजी बापू पाटील भडकले
त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या पीकाला हमीभाव का देऊ शकले नाहीत? 2014 नंतर देशामध्ये एकही मोठं रूग्णालय बांधू शकले नाहीत. स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार रोखू शकले नाहीत. हिंदुत्व रक्षणासाठी एकत्र आलात मात्र काही ठिकाणी मुस्लिम पक्षांसोबत आघाडी कशी केली. तरूणांना रोजगार का देऊ शकले नाहीत. डिझेल पेट्रोल खाद्यतेल अन्नधान्य याच्या किमंती 2014 नंतर दुपटीने का वाढल्या. काळा पैसा भारतात अजूनही का आला नाही. दाऊद अजूनही पकडला का गेला नाही. असं म्हणत रूपाली पाटलांनी देवेेंद्र फडणवीसांवर आगपाखड केली.
“कालपर्यंत जे बाप चोरला म्हणून रडत होते, तेच आज मात्र बापालाच नाकारताहेत”
नर्मदा नदी अजूनही स्वच्छ झाली नाही. देशात अजूनही स्मार्ट सिटी झाली नाहीत. शिक्षण क्षेत्रात केलेल्या धंदेगिरीमुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले वाटोळे याविषयी आधी बोला. खाजगी क्षेत्रातील काम करणाऱ्या कामगारांना कोणी वाली राहिला नाही. त्याविषयी बोला. महाराष्ट्रातील जनतेला प्रश्न भेडसावत असताना तुम्ही नको त्या गोष्टीमध्ये वेळ वाया घालवत आहात. जनतेला मुर्ख बनवत आहात. जनतेची दिशाभूल करत आहात. असा हल्लाबोल देखील रूपाली पाटलांनी भाजपवर केला.
Read also
- शिंदेंना ढाल तलवार…! भाजपची ढाल, इडीची तलवार अन् जनतेवर वार..! ऱाष्ट्रवादीची टीका
- “पंजाच्या पकडीतील मशाल महाराष्ट्र स्वीकारणार नाही”; भाजपची ठाकरेंवर खरमरीत टीका
- अंधेरी निवडणुसाठी राष्ट्रवादी, काॅंग्रेस पाठोपाठ राजकीय पक्षांचा देखील ठाकरेंना पाठिंबा
- “पालघरच्या दुर्दैवी घटनेत मृत्यू झालेल्या साधूंना नक्की न्याय मिळेल”; गिरीश खत्री
- “ही मशाल अन्याय, गद्दारीला जाळणारी…”; उद्धव ठाकरेंनी उंचावली हाती मशाल