मुंबई : शिवसेनेच्या आक्रमक नेत्या आणि विधान परिषदेच्या आमदार मनीषा कायदे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला. याचा मोठा फटका उद्धव ठाकरे यांना बसलाय. यातच काल मुंबईतील काही माजी नगरसेवक भाजप नेत्यांच्या संपर्कात असल्याने उद्धव ठाकरे यांनी आज माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत ठाकरे गटाच्या गटातील चार ते पाच माजी नगरसेवक गैरहजर असल्याने चर्चांना आता उधाण आलं आहे.
हेही वाचा…मुंबई महानगरपालिकांसाठी ठाकरेंची रणनीती, माजी नगरसेवकांची बोलवली तातडीची बैठक
उद्धव ठाकरे यांनी आज मुंबईत मुंबई महापालिकेतील माजी नगरसेवक सेवकांची बैठक बोलावली होती या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना काही सूचना देण्यात आले आहेत कोणतेही अमिषाला बळी पडू नका असं उद्धव ठाकरे यांनी माजी नगरसेवकांना सांगितला आहे मात्र या बैठकीत पाच ते सहा माजी नगरसेवक गैरहजर असल्याने राजकीय वर्तुळात एकच चर्चा सध्या रंगली आहे.
हेही वाचा…“उमेदवारी दिली नाही तर…” भाजप मावळ निवडणुक प्रमुख रवी भेगडेंचं सुचक विधान
दरम्यान, शिंदे गटात इनकमिंग वाढल्या असल्याने माजी नगरसेवकांची बैठक बोलावली होती. मात्र या बैठकीत माजी नगरसेवक आशिष चेंबूरकर हे गैरहजर होते चेंबूरकरांनी तब्येत ठीक नसल्याचे सांगत या बैठकीत गैरहजर असल्याचे कारण सांगितले. आशिष चेंबूरकर हे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदार संघातील माजी नगरसेवक आहेत. त्यांच्याकडे दक्षिण मुंबई विभाग प्रमुखांची जबाबदारी देण्यात आले आहे तसेच बाकीच्या नगरसेवकांनी तब्येत ठीक नसल्याचे कारण देत बैठकीला उपस्थित नसल्याचे सांगितले आहे. आजच्या बैठकीत शिवसेनेतील अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते तर उद्या देखील शिवसेना भवन या ठिकाणी शिवसेनेच्या नेत्यांची बैठक बोलावली आहे त्यामुळे उद्या या बैठकीत आज जे माजी नगरसेवक गैरहजर होते ते उपस्थित राहणार का ? ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
हेही वाचा…“ठाकरे गटाचा मनपावर 1 जुलै ला विराट मोर्चा, आदित्य ठाकरे नेतृत्व करणार
हेही वाचा…एकनाथ शिंदे यांचे निकवर्तीय ‘सचीन जोशी’ला इडीने का उचललं होतं? राऊतांचा सवाल
हेही वाचा…“एकनाथ शिंदेंना गद्दार म्हणायची हिमंत आमच्यात, पोलिसांमध्ये हिंमत असेल तर आम्हाला जेलमध्ये टाकावं”, सुप्रिया सुळे
हेही वाचा…“जयंत पाटील लवकरच राष्ट्रवादीमधून भाजपमध्ये प्रवेश करणार”, राज्यातील बड्या नेत्याचं सुचक विधान