मुंबई : निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन मतं मिळविण्यासाठी फसव्या सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक झाली आहे. महायुती सरकारने विशेष अधिवेशनाचा फार्स करून आज मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात दिलेले 10 टक्के आरक्षण न्यायालयात टिकणारे नाही. सरकारचे पितळ उघडे पडेल म्हणून आज सभागृहात सरकारने विरोधी पक्षाच्या नेत्यांना बोलू दिले नाही. असा घणाघात आज राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी राज्य सरकारवर केला आहे. आज मराठा आरक्षणाबाबत विधेयक मांडण्यात आले. त्यानंतर मराठा समाजाला सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यातच विधेयकावर कोणतीही चर्चा न करता सभागृहात एकमताने विधेयक मंजुर झाल्यानंतर आता सरकारवर टिका केली जात आहे.
हेही वाचा…जागावाटपाबाबत आघाडीची बैठक, ‘त्या’ १४ ते १६ जागांबाबतचा तिढा सुटणार का ?
विजय वडेट्टीवार पुढे म्हणाले की, सरकारने कितीही ढोल वाजवले, उर बडवले तरी आंदोलनकर्त्यांमध्ये सरकारने फसवल्याची भावना आहे. हे या सरकारचे अपयश आहे. महायुतीचे सरकार हे फसवे सरकार आहे. हे मराठा समाजाच्या आता लक्षात आले आहे. दोन वेळा न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा या महायुती सरकारने दिले आहे. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे.
तेलही नाही आणि तुपही नाही. आमच्या मराठा समाज बांधवांच्या हाती या महायुती सरकारने फक्त धुपाटणे दिले आहे. निवडणुकीच्या तोंडावर केवळ मतं मिळवण्यासाठी सरकारने ही नौटंकी केली आहे. ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, अशी काँग्रेस पक्षाची आणि माझी भूमीका वेळोवेळी मांडली असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा….कॉंग्रेसचे १२ खासदार, ४० आमदार भाजपच्या वाटेवर ? 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य, जिंकण्यासाठी काहीपण..!
आज दिलेले 10 टक्के आरक्षण कोणत्याही आधाराशिवाय दिले आहे. त्यामुळे हे आरक्षण न्यायालयात टिकणार नाही. या महायुती सरकारमुळे मराठा समाजाचा पुन्हा भ्रमनिरास होणार आहे. महायुतीचे सरकार बळीराजाची फसगत करणारं फसवं सरकार आहे. बेरोजगार युवक-युवतींची फसगत करणारं फसवं सरकार आहे. परीक्षार्थी उमेदवारांची फसगत करणारं फसवं सरकार आहे. जुमलेबाजी करणारं जुमलेबाज सरकार आहे. मलिदा खाणारं फसवं सरकार आहे. गॅरेंटीच्या नावाखाली फसगत करणार नो गॅरेंटी सरकार आहे. आता आरक्षण प्रश्नी फसगत करणारं फसवं सरकार म्हणून नवी ओळख या सरकारला मिळाली आहे. असा घणाघात देखील त्यांनी चढवला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले पहिल्यांदाच आभार म्हणाले, “ज्या निर्दयीपणाने डोकी फोडली..”
हेही वाचा…“गाढवाचा गोंधळ व लाथांचा सुकाळ”, अन् म्हणे मंत्री, नारायण राणेंचा ‘तो’ व्हिडीओ चर्चेत
हेही वाचा…मनोज जरांगे पाटलांचा मराठा समाजाच्या स्वतंत्र आरक्षणाला विरोध का ? उद्या आंदोलनाची दिशा ठरवणार
हेही वाचा…“मुख्यमंत्री साहेब, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!” शिंदेंनी मराठा समाजाला फसवलं
हेही वाचा…मोठी बातमी….! मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात नेमकं काय म्हणाले ?