मुंबई : मराठा आरक्षणाच्या मसुद्याला राज्याच्या मंत्रिमंडळाने मंगळवारी मंजुरी दिली. त्यानंतर विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मराठा आरक्षणाबाबत प्रस्ताव एकमताने मंजुर करण्यात आला. यानुसार आता मराठा समाजाला शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात दहा टक्के आरक्षण मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे हे आरक्षण सर्वोच्च न्यायालयात देखील टिकणार असून तुम्ही संयम राखा, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. त्यावर मनोज जरांगे पाटलांसह राज्यातील विरोधकांनी राज्य सरकारवर जोरदार टिकास्त्र सोडण्यात सुरूवात केली आहे.
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा अखेर सुर्य उगवला..! “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मंजुर
मराठा आरक्षणावरून गेले अनेक महिने सरकार फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत आहे. आरक्षणाला आमचा विरोध नाही.त्यामुळे सरकारने याविषयीच्या कोणत्याही निर्णयात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही. आरक्षणाचा निर्णय हा सर्वपक्षीय एकमतानेच झालेला निर्णय असेल, हे लक्षात असू द्या. मुंबईच्या मोर्च्यात ‘सगेसोयऱ्यां’वरून दिलेल्या शब्दाची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही. ज्यांच्या नोंदीच सापडलेल्या नाहीत. त्यांचं आरक्षण मराठा समाजावर थोपवण्याचा प्रयत्न केला जातोय. असे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितलं आहे.
हेही वाचा…“राज्यसभेतून पत्ता कट, लोकसभेला इच्छूक नाही,” नारायण राणेंच्या मनात नेमकं काय ?
दरम्यान, सरकार यासाठी वेळकाढूपणा का करतंय? असा सवाल करत मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली असली तरी ते कायद्याच्या कसोटीवर कितपत उतरेल आणि मराठ्यांना ते खरंच मान्य आहे का..? असा सवाल देखील त्यांनी केला. तसेच यात शंकाच आहे. वाईट तर याचं वाटतं की माननीय मुख्यमंत्र्यांनी जाहीर सभेत महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांची शपथ घेतली आणि शपथ पूर्ण न करताच स्वत:च स्वत:ची पाठ थोपटून घेत आहेत. मराठा आरक्षण जोवर कायद्याच्या कसोटीवर खरे उतरत नाही आणि ते प्रत्यक्षात लागू होत नाही, तोवर या शपथेचं ओझं मुख्यमंत्र्याना वाहावे लागेल,हे लक्षात असू द्या. असेही त्यांनी सांगितलं आहे.
मुख्यमंत्री साहेब,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने खोटं बोलू नका..!!मराठा आरक्षणावरून गेले अनेक महिने सरकार फक्त वेळ मारून नेण्याचं काम करत आहे.आरक्षणाला आमचा विरोध नाही.त्यामुळे सरकारने याविषयीच्या कोणत्याही निर्णयात स्वत:ची पाठ थोपटून घेण्याचे कारण नाही.आरक्षणाचा निर्णय हा…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) February 20, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी….! मराठा आरक्षणाचा प्रस्ताव मंजूर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभागृहात नेमकं काय म्हणाले ?
हेही वाचा…जागावाटपाबाबत आघाडीची बैठक, ‘त्या’ १४ ते १६ जागांबाबतचा तिढा सुटणार का ?
हेही वाचा….कॉंग्रेसचे १२ खासदार, ४० आमदार भाजपच्या वाटेवर ? 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य, जिंकण्यासाठी काहीपण..!
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास कोर्टात खेचणार, ओबीसी नेते आक्रमक, ” राजकारण पुन्हा तापणार
हेही वाचा…विशेष अधिवेशनापुर्वीच जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले, म्हणाले, उद्याच आंदोलनाची दिशा…