रत्नागिरी : राज्यसभेच्या निवडणुकीतून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा पत्ता कट करण्यात आला. त्यानंतर नारायण राणे रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडणुक लढवतील, अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. त्यावर अनेक राजकीय नेत्यांनी देखील आपापली प्रतिक्रिया दिली आहे. परंतु मी कोणतीही निवडणुक लढवण्यास इच्छूक नसल्याचे नारायण राणे यांनी सांगितले. त्यामुळे नारायण राणे यांच्या मनात नेमकं काय आहे. असा सवाल यानिमित्ताने उपस्थित केला जात आहे.
हेही वाचा…तुम्हीही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? भाजपप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी सोडलं मौन.. म्हणाले…
राज्यसभा निवडणुकीत पुन्हा संधी दिली नाही म्हणून नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यानंतर त्यांना लोकसभेची उमेदवारी दिली जाईल. असेही सांगण्यात येत होतं. त्यावर नारायण राणे म्हणाले की, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी मी इच्छूक नाही. या संदर्भातली सर्व निर्णय हे पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. अशी महत्वाची प्रतिक्रिया नारायण राणे यांनी दिली आहे.
हेही वाचा…शिंदे गटातील खासदार थोडक्यात बचावले, दिल्लीत झालेल्या अपघातात गाडीचं मोठं नुकसान
दरम्यान, रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघात सध्या ठाकरे गटाचे विनायक राऊत खासदार आहेत. ठाकरे गटाकडून पुन्हा विनायक राऊत यांना संधी दिली जाईल. तर शिंदे गटाकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांच्या नावाचीही चर्चा सुरू होती. मध्येच राज्यसभेवर पुन्हा संधी न दिल्याने नारायण राणे ही जागा लढवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. त्याला शिंदे गटातील नेत्यांनीही सहमती दर्शवली होती. परंतु राणेंनीच निवडणुक न लढण्याचे संकेत दिल्याने आता महायुतीकडून कुणाला उमेदवार दिली जाणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा.चंद्रपुर लोकसभेत वडेट्टीवार विरूद्ध मुनगंटीवार यांच्यात होणार सामना ? निवडणुक लढण्याचे दिले संकेत
हेही वाचा“आमचा पक्ष फुटला आहे, आता…,” जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य
हेही वाचा…शरद पवार गटाला कोर्टाचा मोठा दिलासा, तर अजित पवार गटाला सुनावले खडेबोल, कोर्टात नेमकं काय झालं?
हेही वाचा…धक्कादायक…! “शांतताप्रिय पुणे शहारात गुंडगिरीचा थैमान, जिंवत महिलेला पेट्रोल टाकून झाळले,”
हेही वाचा…“मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन घेऊन काहीच होणार नाही”, राज ठाकरेंचं रोखठोक मत