मुंबई : कॉंग्रेसमधील अनेक बडे नेते कॉंग्रेसचा राजीनामा देऊन दुसऱ्या पक्षात दाखल झालेत. यानंतर आज पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचा बडा नेता भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्यानंतर शरद पवार गटाला आणखी एक धक्का लागणार का ? असं देखील बोललं जात होतं. त्यानंतर या सगळ्या बातम्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यापर्यंत येऊन थांबल्या. त्यातच आता जयंत पाटील यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल”, कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर ?
जयंत पाटील म्हणाले की, काही कुठे येणार नाही आणि जाणार नाही. माझ्या नावाची चर्चा असेल तर चांगलचं आहे. प्रसिद्धी मिळाली की लोकांसमोर जाता येतं. आपण यावर नंतर बोलू. असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे. जेव्हा शरद पवारांनी आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. तेव्हा जयंत पाटील यांच्या डोळ्यातून पाणी आलं होतं. तेव्हापासून जयंत पाटील नेहमी चर्चेत राहिले आहेत.
हेही वाचा…शरद पवारांना धक्क्यावर धक्के, सात आमदारांच्या अपात्रतेची ‘ती’ याचिका फेटाळली
दरम्यान, भाजप प्रवेशाबाबत चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. जयंत पाटील आणि माझी कुठेही, कसलीही चर्चा झालेली नाही. त्यांनी आमच्या पक्षात येण्यासाठी संपर्क केलेला नाही. किंवा त्यांचं माझ्याशी काही बोलणं झालेलं नाही. या कदाचित कपोकल्पित बातम्या असतील. तरीही पंतप्रधान मोदींना साथ देण्यासाठी आमच्याकडे कोणीही येऊ शकतं. असेही ते म्हणाले.
READ ALSO :
हेही वाचा…शिंदे गटातील खासदार थोडक्यात बचावले, दिल्लीत झालेल्या अपघातात गाडीचं मोठं नुकसान
हेही वाचा…लोकसभेच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की…
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजप मनसे युती होणार ? पडद्यामागून हालचाली वाढल्या
हेही वाचा..शरद पवारांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी ? बारामतीत नेमकं चाललंय काय ?
हेही वाचा…“त्या काळात मोठी चुक झाली,” मंडल आयोगाचा उल्लेख करत खासदार उदयनराजे भडकले..