मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत नो रिक्स या धोरणानुसार आता भाजपने मनसेसोबत युती करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. आज भाजपचे मुंबई शहाराध्यक्ष आशिष शेलार यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. तसेच या भेटीची माहिती तसेच युतीसंदर्भात दिल्लीत चर्चा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे युतीसंदर्भात पडद्यामागून मोठ्या राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत.
हेही वाचा…अजितदादांचं सुप्रिया सुळेंना चॅलेंज..! सुप्रिया सुळे म्हणाल्या की,.. माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर..,
आगामी लोकसभा निवडणुकीत कोणताही धोका स्विकारण्याची भाजपने भूमिका घेतलेली दिसून येत नाही. त्यामुळे मागील काही वर्षापासून विरोधातील प्रमुख नेते तसेच पक्ष फोडीचे प्रकार भाजपकडून केले जात आहेत. यातच मुंबईत भाजपने मनसेसोबत युतीसंदर्भात चर्चा केली जात आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि आशिष शेलार यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली आहे. त्यामुळे भाजप मनसेला सोबत घेणार का ? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
दरम्यान, आशिष शेलार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीवर संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे आणि भाजप नेत्यांचे मैत्रीपुर्ण संबंध आहेत. त्यामुळे दोघांमध्ये भेट झाली असेल. या भेटीतून लगेच युतीची चर्चा करण्यात काही अर्थ नाही. यापुर्वीही देवेंद्र फडणवीस यांच्याशी राज ठाकरे यांच्यासोबत भेट झाली होती. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“मोदींसोबत बैठक संपल्यानंतर दोन ग्लास पाणी, अन् घाम…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ ठाकरेंचा किस्सा
तर आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. त्यामुळे त्यांची भेट झाली असेल. जर या भेटीत राजकीय चर्चा झाली असेल तर आनंदाचीच बातमी आहे. मनसे आणि भाजप एकाच विचारधारेचे पक्ष आहेत. ते एकत्र आले तर चांगलंच आहे. कारण भाजपने नेहमीच बेरजेचं राजकारण केलंल असल्याची प्रतिक्रिया भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा..शरद पवारांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी ? बारामतीत नेमकं चाललंय काय ?
हेही वाचा…“त्या काळात मोठी चुक झाली,” मंडल आयोगाचा उल्लेख करत खासदार उदयनराजे भडकले..
हेही वाचा…“तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल”, कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…शरद पवारांना धक्क्यावर धक्के, सात आमदारांच्या अपात्रतेची ‘ती’ याचिका फेटाळली
हेही वाचा…ठरलं तर मग..! गिरीश बापट यांच्यानंतर ‘पुण्याचा कारभारी’ मोहोळ होणार? राजकीय गणितं काय सांगतात ?