बारामती : राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाने बारामती लोकसभा मतदारसंघाकडे विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. अजित पवारांनी बारामतीत मागील काही महिन्यात अनेकदा सभा घेतल्या. या सभांमधून अजित पवारांनी शरद पवार तसेच सुप्रिया सुळे यांच्यावर उघडउघडपणे टिका केली. त्यावर शरद पवार तसेच सुप्रिया सुळे देखील बारामतीत सातत्याने येत आहेत. अशातच आता शरद पवारांची बाजू घेणाऱ्या व्यक्तींना नोकरीवरून काढण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. त्यावरून आता पुन्हा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“मोदींसोबत बैठक संपल्यानंतर दोन ग्लास पाणी, अन् घाम…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ ठाकरेंचा किस्सा
रोहित पवार यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. अनेक वर्षापासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मीडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग मलिदा गॅंग करत असल्याचे रोहित पवारांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“मिटकरींचे अनेक महिलांसोबत लफडी, व्हिडीओ पण…,मिटकरींनी जास्त वटवट करू नये, ” शरद पवार गटाचा इशारा
तसेच आजवर कधी असं घडलं नाही. पण विचारांच्या आणि निष्ठेच्या बाजूने असलेल्या लोकांचे रोजगार घालवले जात असतील तर अनेकांना राजकीय बेरोजगार करण्याची ताकदही याच बारामतीकरांमध्ये आहे. हे कुणाच्यातरी तालावर नाचणाऱ्या मलिदा गॅंग नेही लक्षात ठेवावं. असा इशारा त्यानंतर रोहित पवार यांनी दिला आहे.
अनेक वर्षांपासून पवार कुटुंबावर असलेल्या बारामतीकरांच्या प्रेमाच्या कर्जातून कधीही उतराई होता येणार नाही. पण याची जाणीव ठेवण्याऐवजी आज आदरणीय पवार साहेबांच्या बाजूने कुणी बोललं किंवा सोशल मिडियात व्यक्त झालं तर त्याला नोकरीवरून काढण्याचा आणि त्याच्यावर दादागिरी करण्याचा उद्योग…
— Rohit Pawar (@RRPSpeaks) February 18, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“त्या काळात मोठी चुक झाली,” मंडल आयोगाचा उल्लेख करत खासदार उदयनराजे भडकले..
हेही वाचा…“तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल”, कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…शरद पवारांना धक्क्यावर धक्के, सात आमदारांच्या अपात्रतेची ‘ती’ याचिका फेटाळली
हेही वाचा…ठरलं तर मग..! गिरीश बापट यांच्यानंतर ‘पुण्याचा कारभारी’ मोहोळ होणार? राजकीय गणितं काय सांगतात ?