मुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. यातच आता मराठा आरक्षणासंदर्भात उद्या विशेष अधिवेशन होण्याची शक्यता आहे. तशी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील घोषणा केली आहे. यातच आता मंडल आयोगाचा उल्लेख करत खासदार उदयन राजे यांनी मराठा आरक्षणासंदर्भात आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“मिटकरींचे अनेक महिलांसोबत लफडी, व्हिडीओ पण…,मिटकरींनी जास्त वटवट करू नये, ” शरद पवार गटाचा इशारा
त्या काळात मोठी चुक झाली. मंडल आयोगासह इतरांकडून एक चुक झाली. केवळ मागासवर्गलाच नव्हे तर आर्थिकदृष्ट्या मागास वर्गालाही आरक्षण द्यायला हवं होतं. कोणीही, कुठल्याही जाती-धर्मातील व्यक्ती जर आर्थिकदृष्ट्या मागास असेल तर त्या व्यक्तीला आरक्षण मिळालया हवं. परंतु त्यांना आरक्षण नाही. या आर्थिकदृष्ट्या मागास व्यक्तींना मदत करणं हा विचार त्यावेळी करायला हवा होता आणि तो आरक्षणाच्या माध्यमातून मांडायला हवा होता. असेही उदयन राजे यांनी सांगितले.
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट कोर्टात, येत्या १९ फेब्रुवारीला होणार महत्वाची सुनावणी
दरम्यान, मागील काही दिवसापासून राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या सगेसोयऱ्यांची मागणी राज्य सरकारने मान्य केली आहे. परंतु त्या मागण्यांची अंमलबजावणी व्हावी, यासाठी जरांगे पाटलांनी पुन्हा उपोषणाला सुरूवात केली आहे. यातच आता उद्या मराठा आरक्षणासंदर्भात विशेष अधिवेशन होणार आहे. त्या अधिवेशनात नेमकी कशावर चर्चा होणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल”, कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर ?
हेही वाचा…शरद पवारांना धक्क्यावर धक्के, सात आमदारांच्या अपात्रतेची ‘ती’ याचिका फेटाळली
हेही वाचा…ठरलं तर मग..! गिरीश बापट यांच्यानंतर ‘पुण्याचा कारभारी’ मोहोळ होणार? राजकीय गणितं काय सांगतात ?