मुंबई : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह निवडणुक आयोगाने आणि विधानसभा अध्यक्षांनी अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांच्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात शरद पवार गटाने याचिका देखील दाखल केली आहे. यातच आता सर्वोच्च न्यायालयात येत्या १९ फेब्रुवारी रोजी सुनावणी घेण्यात येणार आहे.
हेही वाचा…पक्षाच्याच कार्यक्रमाला भावना गवळींना डावललं, भाजपच्या नेत्यांकडून ‘या’ नेत्याचं झालं जोरदार कौतूक
राष्ट्रवादी पक्षात फुट पडल्यानंतर दोन्ही गटाच्या वतीने पक्षनाव आणि चिन्हाबाबत दावा सांगितला. त्यानंतर सुरूवातीला निवडणुक आयोग आणि त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी पक्षनाव आणि चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय घेतला. यातच आता शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शरद पवार गटाचे वकिल अभिषेक मनु सिंघवी शरद पवार गटाची बाजू लढवत आहेत.
हेही वाचा…“माढा लोकसभा मतदारसंघ मला चांगलाच ठाऊक,” माढा मतदारसंघावर शरद पवारांनी ठोकला मोठा दावा
दरम्यान, शिवसेना प्रमाणे राष्ट्रवादीचे प्रकरण देखील सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. देशात काही महिन्यात लोकसभा निवडणुकांचा धडका सुरू होणार आहे. त्याआधीच राज्यात राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फुट पाडण्यात भाजपला यश आले आहे. परंतु पक्षात फुट झाली असली तरी सामान्य जनता ही शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याचं बोललं जात आहे.
READ ALSO :
हेही वाचा…लोकसभेपुर्वी कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के, कॉंग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
हेही वाचा…“धनगर समाजाला फसवलं तसं जरांगे पाटलांना देखील सरकार फसवतंय”
हेही वाचा…“ठाकरेंना ईडी लावायची सोडून द्या, राम कदमांनी बोलतांना तेवढा डोळ्याला झेंडुबाम नक्की लावावा”
हेही वाचा…“लोकांना फोन करून दमदाटी केली जाते, बारामतीत असं कधी घडलं नव्हतं”, शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…संसदरत्न पुरस्कार जाहीर..! महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांनी पटकवला पुरस्कार