बारामती : आगामी काही काळात लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. काही जण येतील भाषण करतील, अन् भावनिक होऊन मतं मागतील. परंतु तुम्ही विकासाला मत द्या. पार्लमेंटमध्ये नुसतं भाषण करून बारामतीचा विकास होणार नाही. त्यामुळे तुम्हाला महायुतीचा उमेदवार जिंकून द्यावा लागेल. असं काल झालेल्या बारामतीच्या मेळाव्यात अजित पवारांनी बारामतीकरांना साध घातली. तर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टिका केली. त्यानंतर आता शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्ह गेल्यानंतर शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर गेले. त्याठिकाणी त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अजित पवारांना जोरदार प्रत्युत्तर दिलं. बारामती मतदारसंघातील लोक आम्हाला वर्षानुवर्ष ओळखतात. त्यामुळे आमच्याकडून भावनात्मक असे अपील करता येणार नाही. पण ज्या पद्धतीने विरोधकांकडून भूमिका मांडली जाते ती पद्धत, त्यांची भाषणे ही काहीतरी वेगळे सुचवतायंत आणि त्याची नोंद बारामतीचा समंजस मतदार निश्चितपणाने घेईल. असं शरद पवारांनी म्हटलंय.
हेही वाचा…“भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा ?” निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ
तर उमेदवाराला निवडणुकीत मतदारांची साथ माण्याचा अधिकार आहे. परंतु संपुर्ण लोक एका कुटुंबातील एका बाजूला आहेत आणि मी एकटॉा आहे, असे सांगणे याचा अर्थ लोकांना स्वत:च भावनात्मक भूमिका मांडून त्यांची सहानुभूती मिळवण्याचा त्याठिकाणी प्रयत्न दिसतो. अनेक कार्यकर्त्यांनी मला सांगितलं की, आम्हाला फोन येतात. दमदाटी केली जाते. या सर्व गोष्टी कधी बारामती मतदारसंघात नव्हत्या. या पहिल्यांदाच पाहायला मिळत आहेत. असेही शरद पवारांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्षांचा निकाल आम्हा लोकांना न्याय देणारा नाहीच आहे, पण पदाचा गैरवापर कसा होतो. याचे उदाहरण देशासमोर देण्यासंबंधीचा हा निर्णय आहे. आणि त्याला पर्याय आम्ही सुप्रीम कोर्टात हे प्रकरण दाखल केलेले आहे. आमची सुप्रीम कोर्टाला विनंती असणार आहे की, निवडणुका जवळ आलेल्या आहेत, तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्या. अनेक प्रकारचे निर्णय असे झाले.
हेही वाचा…लेकांचं दमदार भाषण ऐकून मुख्यमंत्र्यांच्या डोळ्यात आलं पाणी, म्हणाले…
परंतु, पक्ष आणि चिन्ह हे दुसऱ्याला देणे याबाबत असा निर्णय कधी झाला नव्हता. सर्व जगाला माहिती आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली, या पक्षाची उभारणी कोणी केली हे माहिती असताना देखील आणि वस्तूस्थिती असूनही पक्ष अन्य लोकांच्या हातात देणे हा एक प्रकारचा अन्याय करणारा निर्णय आहे. त्यामुळे, आम्हाला सुप्रीम कोर्टात जाण्याशिवाय पर्याय नाही. असेही शरद पवारांनी स्पष्ट केले.
READ ALSO :
हेही वाचा…संसदरत्न पुरस्कार जाहीर..! महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांनी पटकवला पुरस्कार
हेही वाचा…पक्षाच्याच कार्यक्रमाला भावना गवळींना डावललं, भाजपच्या नेत्यांकडून ‘या’ नेत्याचं झालं जोरदार कौतूक
“माढा लोकसभा मतदारसंघ मला चांगलाच ठाऊक,” माढा मतदारसंघावर शरद पवारांनी ठोकला मोठा दावा
हेही वाचा…पक्ष गेलं, चिन्हं गेलं, शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर, म्हणाले….
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ईडीची चौकशी लावा,” पन्नास खोकेंचा आरोपावरून रामदास कदम संतापले