कोल्हापुर : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात आता राजकीय मेळाव्यांचा धडाका सुरू झाला आहे. यातच कालपासून कोल्हापुर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा मेळावा होत आहे. काल शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टिका केली. आमच्यावर खोके घेतल्याचा आरोप केला जातोय. परंतु खरे खोके तर मातोश्रीवर गेले आहेत. त्यामुळे आमची नाही तर उद्धव ठाकरे यांची ईडी चौकशी लावावी, असे शिंदे गटाचे आमदार रामदास कदम यांनी म्हटले. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रत्युत्तर दिलंय.
हेही वाचा…“उद्धव ठाकरेंना ईडीची चौकशी लावा,” पन्नास खोकेंचा आरोपावरून रामदास कदम संतापले
रामदास कदम यांच्यावर फार बोलून त्यांना महत्व देण्याची गरज वाटत नाही. इतरांना ईडी लावायची की नाही ते सोडून द्या. पण रामदास कदमांनी बोलतांना डोळ्याला झेंडुबाम नक्की लावावा, असं म्हणत सुषमा अंधारे यांनी कदमांना डिवचलं. तसेच उद्धव ठाकरे यांना ईडी लावली पाहिजे म्हणजे भ्रष्टाचारी कोण हे सर्व महाराष्ट्रातील जनतेला कळले पाहिजे. असेही रामदास कदमांनी म्हटले होते. तसेच शिंदे गटातील चाळीस आमदारांनी खोके घेतल्याचं सिद्ध केलं तर मी ठाकरेंच्या घरी भांडी घासायला जाईन नाही तर त्यांनी यावे, त्यावर प्रत्येक व्यक्तीला आपली पात्रता इतक्या लवकर कशी कळते असा खोचक सवाल देखील अंधारेंनी केला.
हेही वाचा…“भाजपचा मेळावा आहे की गावगुंडांचा मेळावा ?” निलेश राणेंची भास्कर जाधवांना शिवीगाळ
दरम्यान, काल रत्नागिरीत झालेल्या राड्याबाबत देखील सुषमा अंधारे यांनी देखील फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. त्या म्हणाल्या की, भाजपने अगदी पोलिस स्टेशनमध्ये गोळीबार होण्या इतपतची गुंडागर्दी वाढवली असून घोसाळकरांचा मृत्यू असेल किंवा निखिल वागळे यांच्यावरचा हल्ला असेल. तिथपर्यंतची गुंडागर्दी वाढवली. भाजपकडून ही भाषा शोभत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी थोडा अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“लोकांना फोन करून दमदाटी केली जाते, बारामतीत असं कधी घडलं नव्हतं”, शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल
हेही वाचा…संसदरत्न पुरस्कार जाहीर..! महाराष्ट्रातील ‘या’ पाच खासदारांनी पटकवला पुरस्कार
हेही वाचा…पक्षाच्याच कार्यक्रमाला भावना गवळींना डावललं, भाजपच्या नेत्यांकडून ‘या’ नेत्याचं झालं जोरदार कौतूक
“माढा लोकसभा मतदारसंघ मला चांगलाच ठाऊक,” माढा मतदारसंघावर शरद पवारांनी ठोकला मोठा दावा
हेही वाचा…पक्ष गेलं, चिन्हं गेलं, शरद पवार पहिल्यांदाच बारामती दौऱ्यावर, म्हणाले….