मुंबई : बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात अजित पवार गट जोरदार तयारी करतांना दिसत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराचा विजयरथ देखील शहरात दाखल झाला आहे. तर बारामतीच्या मेळाव्यातून आपला उमेदवार निवडून द्यावा, अशी भावनिक साद देखील अजित पवारांनी बारामतीकरांना घातली आहे. यावर आता खासदार सुप्रिया सुळे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…“ठाकरेंना ईडी लावायची सोडून द्या, राम कदमांनी बोलतांना तेवढा डोळ्याला झेंडुबाम नक्की लावावा”
लोकशाहीमध्ये निवडणुकीसाठी कुणीतरी विरोधात उभे राहणारच आहे. त्यांच्याकडे माझ्यासारखा तगडा उमेदवार असेल तर जरूर त्यांनी उभा करावा. त्या उमेदवाराशी मी जाहीर चर्चा करायला तयार आहे. ते म्हणतील त्या ठिकाणी, कधीही आणि कोणत्याही विषयावर मी चर्चा करण्यासाठी तयार आहे. असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. जर लोकसभेला माझ्या उमेदवाराला मतदान दिले नाही तर विधानसभेला मी उभा राहणार नाही. त्यामुळे मी निवडणुकीला उभं आहे असं समजून मतदान करा, असेही अजित पवार म्हणाले होते.
हेही वाचा…“लोकांना फोन करून दमदाटी केली जाते, बारामतीत असं कधी घडलं नव्हतं”, शरद पवारांचा अजित पवारांवर हल्लाबोल
दरम्यान, अजित पवारांनी शरद पवारांवर देखील अप्रत्यक्षपणे टिका केली होती. त्यावर देखील सुप्रिया सुळे यांनी भाष्य केलं आहे. अजित पवारांच्या भाषणानंतर मला वेदना झाल्या. राजकारण कौटुंबिक पातळीवर आणून ठेवलं आहे. माझं राजकारण कौटुंबिक नसून जनसेवेचं आहे. मी राजकारणात, समाजकारण चांगला बदल घडविण्यासाठी एक धोरणकर्ती म्हणून पुढे आले. बारामतीमधील लोकांनी मला तीन वेळा निवडून दिले. संसद हे लोकशाहीचे सर्वात मोठे मंदिर असून लोकशाहीसाठी अनेक महापुरूष लढले. त्याच लोकशाहीवर अविश्वास दाखवला गेला. ते अतिशय चिंताजनक आहे. हा देश लोकशाहीकडून दडपशाहीकडे जावा अशी काहींची इच्छा असल्याचेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा“मोदींसोबत बैठक संपल्यानंतर दोन ग्लास पाणी, अन् घाम…” एकनाथ शिंदेंनी सांगितला ‘तो’ ठाकरेंचा किस्सा
हेही वाचा“मिटकरींचे अनेक महिलांसोबत लफडी, व्हिडीओ पण…,मिटकरींनी जास्त वटवट करू नये, ” शरद पवार गटाचा इशारा
हेही वाचा…विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गट कोर्टात, येत्या १९ फेब्रुवारीला होणार महत्वाची सुनावणी
हेही वाचा…लोकसभेपुर्वी कॉंग्रेसला धक्क्यावर धक्के, कॉंग्रेसचा आणखी एक माजी मुख्यमंत्री भाजपच्या वाटेवर
हेही वाचा…“धनगर समाजाला फसवलं तसं जरांगे पाटलांना देखील सरकार फसवतंय”