नवी दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसबाबत केंद्रीय निवडणुक आयोगाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात शरद पवार गटाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. आज सर्वोच्च न्यायालयात न्यायमूर्ती सुर्यकांत आणि न्यायमुर्ती विश्ननाथन यांच्या खंडपीठासमोर राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षनाव संदर्भात महत्वाची सुनावणी पार पडली. या सुनावणीत कोर्टाने निवडणुक आयोगाला निर्देश दिले तर अजित पवार गटाला खडेबोल सुनावले असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजप मनसे युती होणार ? पडद्यामागून हालचाली वाढल्या
सर्वोच्च न्यायालयात आज शरद पवार गटाकडून वकिल अभिषेक मनु सिंघवी यांनी पहिल्यांदा युक्तिवाद केला. त्यांनी कोर्टाकडे काही महत्वाच्या मागण्या केल्या. मराठा आरक्षणाबाबत उद्या विशेष अधिवेशन होत आहे. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी आम्हाला पक्षाचा प्रचार करण्यासाठी पत्रकांची छपाई करावी लागणार आहे. त्यानुसार आम्हाला तात्पुरत्या पक्षाचे नाव, चिन्ह देण्यात येईल ते निवडणुकीपुरता कायम देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. तसेच अजित पवारांच्या गटाचा व्हीप शरद पवार यांच्या गटाला लागू होत नाही. आमची कोर्टाला विनंती आहे की नाव आणि चिन्ह पुन्हा कायम स्वरूपासाठी देण्यात यावे, असे देखील सिंघवी कोर्टात म्हणाले.
हेही वाचा..शरद पवारांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी ? बारामतीत नेमकं चाललंय काय ?
दरम्यान, शरद पवार गटाने नॅशनलिस्ट कॉंग्रेस पार्टी शरदचंद्र पवार हेच नाव निवडणुकीपर्यंत राहू द्या अशी विनंती केली. तर अजित पवार गटाकडून वकिल मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली. यावेळी कोर्टाने रोहतगी यांना उद्देशुन म्हटलं की, मुकुल रोहगती तुम्ही लक्षात घ्या. आदेशात काय लिहिलं आहे. ? दोन्ही गटानी घटना पाळली नाही. कोणीही अपात्र ठरलं नाही. असं म्हणत अजित पवार गटाला दोन आठवड्याची उत्तर देण्यात मुदत दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…धक्कादायक…! “शांतताप्रिय पुणे शहारात गुंडगिरीचा थैमान, जिंवत महिलेला पेट्रोल टाकून झाळले,”
हेही वाचा…“मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन घेऊन काहीच होणार नाही”, राज ठाकरेंचं रोखठोक मत
हेही वाचातुम्हीही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? भाजपप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी सोडलं मौन.. म्हणाले…
हेही वाचा…शिंदे गटातील खासदार थोडक्यात बचावले, दिल्लीत झालेल्या अपघातात गाडीचं मोठं नुकसान
हेही वाचा…लोकसभेच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की…