मुंबई : मागील काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत चालला आहे. यातच उद्या राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत विशेष अधिवेशन घेणार असून तशी मुख्यमंत्र्यांनी देखील घोषणा केली आहे. राज्य सरकारला अलिकडेच मागासवर्ग आयोगाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यामुळे सभागृहात यावर चर्चा करण्यात येणार आहे. याच पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महत्वाचं भाष्य केले आहे.
हेही वाचा…“त्या काळात मोठी चुक झाली,” मंडल आयोगाचा उल्लेख करत खासदार उदयनराजे भडकले..
मराठा आरक्षणासंदर्भात घेत असलेल्या अधिवेशनाने काहीच होणार नाही. मी यापुर्वीदेखील अनेकदा सांगितलं आहे की, मराठा आरक्षणाचा विषय हा राज्याचा नाहीच. हा केंद्र सरकारच्या अखत्यारितल्या आणि सर्वोच्च न्यायालयाचा विषय आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनावेळी देखील मी सांगितलं होतं की यात अनेक तांत्रिक अडचणी आहेत. या तांत्रिक अडचणी सोडवल्याशिवाय आरक्षणाचा विषय पुढे जाऊ शकत नाही. असे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.
हेही वाचा…“तुमचा आणि आमचा Boss लवकरच एकच असेल”, कॉंग्रेसचा बडा नेता भाजपच्या वाटेवर ?
तसेच मराठा आरक्षणावरून सगळं झुलवलं जात आहे. यातून हाती काहीच लागणार नाही. त्या दिवशी मी त्यांच्यासमोर जाऊन सांगितलं होतं की असं काही होणार नाही. मी आताही तेच सांगेन. अशी प्रतिक्रिया राज ठाकरे यांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचातुम्हीही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? भाजपप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी सोडलं मौन.. म्हणाले…
हेही वाचा…शिंदे गटातील खासदार थोडक्यात बचावले, दिल्लीत झालेल्या अपघातात गाडीचं मोठं नुकसान
हेही वाचा…लोकसभेच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की…
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजप मनसे युती होणार ? पडद्यामागून हालचाली वाढल्या
हेही वाचा..शरद पवारांची बाजू घेणाऱ्यांना नोकरीवरून काढण्याची धमकी ? बारामतीत नेमकं चाललंय काय ?