पुणे : लोकसभा निवडणुक कधीही जाहीर होऊ शकते अशी स्थिती आहे. या निवडणुकीच्या तोंडावर देशपातळीवर भाजपात आणि एनडीएत इनकमिंग वाढलं आहे. तर महाराष्ट्रात महायुतीमध्ये लोक मोठ्या प्रमाणावर येत आहेत. काही दिवसांपुर्वीच अशोक चव्हाण यांनी भाजपला झेंडा हाती घेतला आहे. मिलिंद देवरा एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत गेले तर बाबा सिद्दीकी हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीबरोबर गेले. यातच आता जयंत पाटील भाजपात जाणार असल्याची चर्चा आहे. यातच आता भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही व्यक्त केले होते. त्यावर आता जयंत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
हेही वाचा…लोकसभेच्या उमेदवारीसाठी विजय वडेट्टीवार भाजपात येणार, चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की…
मी कुणाशीही संपर्क केलेला नाही. तसंच भाजपच्याही एकाही नेत्याने माझ्याशी संपर्क केलेला नाही, हे मी स्पष्ट करतो. शिवाय आमचा पक्ष फुटला आहे. आमच्या पक्षातून काही लोक निघून गेले आहेत. मात्र आता आमचा पक्ष महाराष्ट्रातल्या तरूणांना घेऊन पुढे येतो आहे. आमचा हा प्रयत्न आहे की येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आम्ही चांगली कामगिरी करू. असेही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.
हेही वाचा…लोकसभा निवडणुकीत भाजप मनसे युती होणार ? पडद्यामागून हालचाली वाढल्या
दरम्यान, आम्ही कॉंग्रेस राष्ट्रवादीशी तलाक घेतला आहे. आता आम्ही विकासाचा संसार करतोय असं वक्तव्य गुलाबराव पाटील यांनी केलं होतं. यावर विचारलं असता जयंत पाटील म्हणाले की, कुणाशी कितीवेळा तलाक घेतला हा मुद्दा महत्वाचा नाही. आत्ता ते जिथे आहेत तिथे सुखी आहेत का ? तिथे सुखी असतील तर काही कुणाचं म्हणणं नाही. पण ते तसंच दिसत नाही हीच तर महाराष्ट्रापुढे असलेली शोकांतिका आहे. असही जयंत पाटालांनी म्हटलं.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवार गटाला कोर्टाचा मोठा दिलासा, तर अजित पवार गटाला सुनावले खडेबोल, कोर्टात नेमकं काय झालं?
हेही वाचा…धक्कादायक…! “शांतताप्रिय पुणे शहारात गुंडगिरीचा थैमान, जिंवत महिलेला पेट्रोल टाकून झाळले,”
हेही वाचा…“मराठा आरक्षणाबाबत अधिवेशन घेऊन काहीच होणार नाही”, राज ठाकरेंचं रोखठोक मत
हेही वाचातुम्हीही भाजपमध्ये प्रवेश करणार का ? भाजपप्रवेशाबाबत जयंत पाटलांनी सोडलं मौन.. म्हणाले…
हेही वाचा…शिंदे गटातील खासदार थोडक्यात बचावले, दिल्लीत झालेल्या अपघातात गाडीचं मोठं नुकसान