मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपाची चर्चा करण्याकरिता महाविकास आघाडीची बैठक या आठवड्यात मुंबईत होणार आहे. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना या बैठकीसाठी बोलवण्यात येणार आहे. यातच आघाडीच्या घटक पक्षांच्या नेत्यांनी एकत्रित बसून जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करावा आणि त्यानंतर घटक पक्षांच्या शीर्षस्थ नेत्यांची मान्यता घ्यावी, असे ठरले आहे.
हेही वाचा….चंद्रपुर लोकसभेत वडेट्टीवार विरूद्ध मुनगंटीवार यांच्यात होणार सामना ? निवडणुक लढण्याचे दिले संकेत
आधी महाविकास आगाडीच्या बैठकी झाल्या होत्या. पण अजूनही १४ ते १६ जागांबाबतचा तिढा कायम असल्याचे समजत आहे. कॉंग्रेसची जिंकण्याची क्षमता नाही, असेही मतदारसंघ कॉंग्रेस मागत असल्यामुळे इतर घटक पक्षांची नाराजी असल्याचे समजत आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या साथीने शिवसेनेने २३ जागा लढल्या होत्या आणि १८ जागा जिंकल्या होत्या. शिवसेना उद्धव ठाकरे गट १८ पैकी १३ खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत.
हेही वाचा…“आमचा पक्ष फुटला आहे, आता…,” जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य
खासदार गेले असले तरी स्थानिक मतदार आणि शिवसैनिक आमच्यासोबत आहेत असे म्हणत शिवसेनेकडून अधिकाधिक जागा मागितल्या जात आहेत, असे सुत्रांनी सांगितले आहे. त्यामुळेच जागावाटपाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होऊन देखील अद्यापही पुर्ण होऊ शकलेली नसल्याचे दिसून येत आहे.
READ ALSO :
हेही वाचा….कॉंग्रेसचे १२ खासदार, ४० आमदार भाजपच्या वाटेवर ? 370 जागा जिंकण्याचे लक्ष्य, जिंकण्यासाठी काहीपण..!
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास कोर्टात खेचणार, ओबीसी नेते आक्रमक, ” राजकारण पुन्हा तापणार
हेही वाचा…विशेष अधिवेशनापुर्वीच जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले, म्हणाले, उद्याच आंदोलनाची दिशा…
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा अखेर सुर्य उगवला..! “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मंजुर
हेही वाचा…“राज्यसभेतून पत्ता कट, लोकसभेला इच्छूक नाही,” नारायण राणेंच्या मनात नेमकं काय ?