नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीत ५४३ पैकी ३७० जागा जिंकण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाजपने इतर पक्षांच्या निवडक नेत्यांसाठी आपले दरवाजे खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभेच्या ज्या जागा भाजपने कधीच जिंकल्या नाहीत. लोकसभेच्या त्या १६१ जागांसाठी भाजपने इतर पक्षांच्या नेत्यांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यासाठी अशा नेत्यांच्या प्रवेशाची तपासणी करण्यासाठी चार सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे.
हेही वाचा…“आमचा पक्ष फुटला आहे, आता…,” जयंत पाटील यांचं महत्वाचं वक्तव्य
आगामी लोकसभा निवडणुकी जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी भाजप आता कोणत्याही स्तरावर जाणार असल्याचे दिसत आहे. ज्या १६१ जागा भाजपला कधीच जिंकता आल्या नाहीत. अशा जागांसाठी भाजपने इतर पक्षांच्या नेत्यांना घेण्यास सुरूवात केली आहे. यासाठीच भाजपने एक समिती स्थापन केली आहे. या समितीत केंद्रीय मंत्री भुपिंदर यादव, आसामचे मुख्यमंत्री हेमंता बिस्वा सरमा, महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आणि सरचिटणीस विनोद तावडे आणि सरचिटणीसस बी. एल. संतोष यांचा या समितीत समावेश करण्यात आला आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाला कोर्टाचा मोठा दिलासा, तर अजित पवार गटाला सुनावले खडेबोल, कोर्टात नेमकं काय झालं?
आगामी काही दिवसात कॉंग्रेसचे ४० आमदार, डझनभर खासदार, आणि इतर प्रमुख नेते पुढील आठवड्यात टप्प्याटप्याने भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे. यातच ज्याठिकाणी भाजपचे वचर्स्व आहे. परंतु तिथे जागा मिळत नाही. त्याठिकाणी समितीने लक्ष्य देण्यात यावे, असे आदेश भाजपकडून देण्यात आले आहेत. यातच काल कॉंग्रेसचे आमदार महेंद्रजीत मालवीय यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्याचं राजस्थान भाजप अध्यक्ष सीपी जोशी यांनी स्वागत केले.
लोकसभा निवडणुकीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला पंजाब, तेलंगणा, आणि आंध्र प्रदेश या राज्यांवर विशेष लक्ष आहे. तर उर्वरित दक्षिणेकडील राज्यांसाठी भाजपने १० पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे लक्ष ठेवले आहे. यातच महाराष्ट्र, आसाम, उत्तर प्रदेश, जम्मू काश्मिर, मध्य प्रदेश या राज्यात भाजपचे अधिकाधिक जागांवर लक्ष आहे. तर २०१९ मध्ये जिंकलेल्या लोकसभेच्या जागांव्यतिरिक्त पक्ष या राज्यांमधून किमान २५ हून अधिक जागा जोडू शकले असे भाजपच्या समितीला वाटत आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यास कोर्टात खेचणार, ओबीसी नेते आक्रमक, ” राजकारण पुन्हा तापणार
हेही वाचा…विशेष अधिवेशनापुर्वीच जरांगे पाटील राज्य सरकारवर भडकले, म्हणाले, उद्याच आंदोलनाची दिशा…
हेही वाचा…मराठा आरक्षणाचा अखेर सुर्य उगवला..! “मराठा समाजाला १० टक्के आरक्षण मंजुर
हेही वाचा…“राज्यसभेतून पत्ता कट, लोकसभेला इच्छूक नाही,” नारायण राणेंच्या मनात नेमकं काय ?
हेही वाचा.चंद्रपुर लोकसभेत वडेट्टीवार विरूद्ध मुनगंटीवार यांच्यात होणार सामना ? निवडणुक लढण्याचे दिले संकेत