मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनात दगडं कुठून आले, ट्रॅक्टर, जेसीबी आणि आंदोलनाच्या सभांसाठी इतका पैसा आला कुठून? यासंदर्भात एसआयटी चौकशी झाली पाहिजे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना शरद पवारांचा फोन येत होता. असा गंभीर आरोप करत भाजपच्या नेत्यांनी सभागृहात जरांगे पाटलांना अटक करण्याची मागणी केली. यातच मनोज जरांगे पाटलाला राजकारणी कोणी केलं ? त्यांची हिमंत कोणी वाढवली? असा सवाल करत राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील सभागृहात कळीचा मुद्दा उपस्थित केला.
हेही वाचा…“गोर गरिबांचा कैवारी, टायगर इज बॅक ” गणपत गोळीबार प्रकरणातील महेश गायकवाडांना रूग्णालयातून डिस्चार्ज
राज्याच्या दोन्ही विधिमंडळाच्या सभागृहात मराठा आंदोलनाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी भाजपच्या आमदारांनी लावून धरली. त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सरकारला एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले. त्यानंतर राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आंदोलनाबाबत एसआयटी स्थापन करण्यात येईल. अशी घोषणा केली. त्यानंतर जरांगे पाटील फडणवीसांवर चांगलेच आक्रमक झाले आहेत.
हेही वाचा…“बारामतीतून सुनेत्रा पवार दीड लाखांनी विजयी होतील,” भाजपच्या ‘या’ माजी खासदाराने वर्तवला अंदाज
देवेंद्र फडणवीस यांच्यावर पुन्हा जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केलेत. मराठ्यांना मोठं न होऊ देण्याचा फडणवीस यांचा षडयंत्र आहे. मला तुरूंगवास झाला तरी तो पत्कराला तयार आहे. परंतु ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण घेतल्याशिवाय हटणार नाही. तसेच जरांगे पाटलांनी ना शरद पवारांची मदत घेतली ना बच्चू कडूंची मदत घेतली आहे. त्यामुळे माझ्याकडे एक रूपये देखील सापडणार नाही. तुम्ही कितीही चौकशी करा. त्यासाठी आम्ही तयार आहोत, असेही जरांगे पाटलांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“मराठा आरक्षण आंदोलनकर्त्यांचा बोलवता धनी कोण ?” SIT ची चौकशीची मागणी, सभागृहात एकच गोंधळ
हेही वाचा…“विदर्भामध्ये वसुली गॅंग बसलीय”, शिंदे गटात प्रवेश करताच ‘या’ महिला नेत्याने ठाकरेंवर चढवला हल्ला
हेही वाचा…मराठा आरक्षणावर शरद पवार अन् उद्धव ठाकरे गप्प का ? भाजप नेत्याचा सवाल
हेही वाचा…“पार्लमेंटमध्ये नवरा जाणार आहे की मी जाणार”, सुप्रिया सुळेंनी अजितदादांना डिवचलं
हेही वाचा“राष्ट्रवादीच्या प्रचाराची तुतारी फडणवीसांनी फुंकली,” राऊतांनी ‘तो’ व्हिडीओ शेअर करून फडणवीसांना डिवचलं